Skip to main content

गोष्ट नवी रित जुनी ....

                         राजकारणात नैतिकतेच्या गोष्टी नेहमीच विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून का केल्या जातात? सत्तेच्या शिखरावर पोहोचल्यानंतर मात्र या नैतिकतेला राजकिय पक्ष का विसरत असावेत ? हे प्रश्न अत्यंत सोपे वाटत असले तरी आजपर्यंत याची उत्तरे देशाला मिळालेली नाहीत . अरुणाचल प्रदेश नंतर मणिपूर आणि आता उत्तराखंड राज्यातील सत्ता हस्तगत करण्यासाठी जो घोडेबाजार चाललाय तो हैराण करणारा असला तरी भारतीय राजकारणासाठी नवीन मात्र नक्कीच नाही ..

                        सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांचे पक्षांतर करून सत्ताधारी पक्षाला पदच्युत करणे हे भारतीय राजकारणासाठी नवीन नाही ..उत्तराखंड मधील हरिश रावत यांना त्यांच्या पक्षातील विधानसभा सदस्यांना सांभाळता येत नाही. महत्वाचे म्हणजे सत्ता खेचण्याचा खेळ तो पक्ष खेळतो आहे जो आगोदर काँग्रेस वर लोकशाहीचा गळा घोटणारा पक्ष म्हणून आरोप करताना कधीही थकत नव्हता .

                             देशाच्या इतिहासात अधिकांश राज्यात काँग्रेसचीच सरकारे जास्त वेळा सत्तेवर आली आहेत . चुकुन काँग्रेस कुठे विरोधी पक्षात असेल तर तिथं सत्ताधारी पक्ष नेहमीच काँग्रेस च्या निशान्यावर असायचा . काँग्रेस ने आंध्र प्रदेशात एन टी रामाराव आणि हारीयाणातील चौधरी देविलाल यांच्या सरकारांना पदच्युत करण्यात आले होते. त्यावेळी भाजपाने काँग्रेस चा विरोध करताना कोणतीही कसर सोडलेली नव्हती . (सोडने योग्य ही नव्हते ...)

                                  उत्तराखंड मधील जनतेने काँग्रेस ला पाच वर्षासाठी सत्ता सोपवली होती त्यापैकी जवळपास चार वर्ष पुर्ण झाली आहेत आता पुढच्या विधानसभा निवडणुका फक्त एका वर्षाच्या अंतरावर येवुन ठेवल्या आहेत . अशा परिस्थितीत भाजपाला हे वर्ष निवडणुकांच्या तयारीत घालवायला हवे का सत्तेचा घोडेबाजार करण्यात ?  बिहार मध्ये ही जितन राम मांझी ना मोहरा बनवुन भाजपाने खेळ करण्याचा प्रयत्न केला होता . त्याचे परिणाम आपल्या सर्वांपुढे आहेतच . भाजापाने दिल्लीत जी चुक केली ती बिहार मध्ये दुरूस्त केली नाही आणि बिहार ची च पुनरावृत्ती आता उत्तराखंड मध्ये होताना दिसत आहे .
         
                           राजकीय पक्ष राजकारणात सत्ता मिळवण्यासाठीच असतात हे मान्य आहे , यात कोणती चुक ही नाही . परंतु त्यासाठी सत्तेत येण्याचा मार्ग योग्य असावा . मागच्या दाराने सत्ता मिळवता येईल ही परंतु जनतेच्या नजरेत तुमचे स्थान उंचावणार नाही . असो शेवटी जेंव्हा जेंव्हा कुणी असा प्रकार केलाय तेंव्हा तेंव्हा जनतेने त्यांला योग्य प्रत्युत्तर दिलेले आहे..

~▪■ संदीप नागरगोजे, गंगाखेड ■▪~

Comments

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

नामांतर चळवळ आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे

२१ एप्रिल १९९४ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत एका ऐतिहासिक विधेयकावर चर्चा सुरू होती . हे विधेयक यासाठी ऐतिहासिक होते की  फक्त मराठवाड्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील शोषित बहुजन समाजाची एक भावना होती की औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले जावे . संपूर्ण सभागृहात सर्वत्र शांतता होती , नामातंर चळवळीस मराठवाडय़ात उग्र रूप प्राप्त झाले होते .मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे का गरजेचं आहे या विषयी सभागृहात एक आवाज घुमत होता. सर्व सदस्य शांतपणे महाराष्ट्राच्या या तरुण जिगरबाज योध्द्याचे भाषण ऐकत होते. तो आवाज होता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा . आपल्या भाषणात ते म्हणतात "भारतीय राज्यघटनेने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य सामान्य, शोषित, दलित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. समाजातील भेदभाव , अस्पृश्यता या विरोधात आवाज उठवाला . समाजातील आर्थिक विषमता दुर करण्यासाठी प्रयत्न केले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर या शोषित समा...