Skip to main content

हा बाजार बजेटचा ...

हा बाजार बजेटचा ...
__________________________________
----------------------------------------------------------
           
                   भारतात कोणताही विषय पुर्ण देशभर वातावरण तयार करू शकतो . आजकाल जेंव्हा पासून खाजगी वृत्तवाहिन्या सुरू झाल्या आणि त्यांचा प्रसार झाला आहे तेंव्हापासून तर अशा कामांना खुपच बहार आली आहे . अर्थसंकल्पाच्या बाबत सांगायचे झाले तर आपल्याला अर्थसंकल्पाविषयी  तेवढंच ज्ञान असते जेवढं एखाद्या कपडे शिवणार्‍या टेलर ला बांधकाम व्यावसाययाचे असते . अर्थातच जे  अर्थसंकल्पावर तीवृ स्वरूपाच्या प्रतिक्रिया देतात त्यांना अर्थसंकल्प  कितपत समजतो हा संशोधनाचा विषय आहे. 

             अशावेळी न्युज चॅनेल्सवरील चर्चां तर पार गोंधळात टाकण्याचे काम करतात . या चर्चांमध्ये जाणकार, अर्थतज्ञ , नेतेमंडळी पक्षाचे प्रवक्ते , विरोधी पक्षनेते, सल्लागार पत्रकार आणि अशी असंख्य पात्र जबरदस्त वादविवाद करतात . परंतु या चाललेल्या चर्चा वजा गोंधळात आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतो ती म्हणजे प्रवक्ता सत्ताधारी पक्षाचा असेल तर तो अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना हा अर्थसंकल्प ऐतिहासिक असल्याचे सांगतो आणि त्या अर्थसंकल्पास सर्वसमावेशक अर्थ संकल्प सिध्द करण्यासाठी स्वतःला त्या चर्चेत तासभर झोकुन देतो . त्याच वेळी विरोधी पक्षाचे लोक त्या अर्थसंकल्पाला निराशा करणारा अर्थसंकल्प वगैरे वगैरे सांगतात किंवा काही प्रवक्ते हा अर्थसंकल्प त्यांची काॅपी केलेला असल्याचे सांगतात .

             प्रत्यक्षात सर्वच अर्थसंकल्पाबाबत  एक समान बाब पहायची झाली तर प्रत्येक वेळी महागाई वाढलेली आहे . गेल्या काही वर्षांपासून च्या किमती कशा वाढल्या आहेत ते पहील्या वर ही गोष्ट स्पष्ट होते ..
               
              या वर्षाच्या अर्थसंकल्पाबाबत खुप चर्चा आहे की हा अर्थसंकल्प ग्रामीण भागाचा आणि पर्यायाने गरीबांचा उध्दार करणारा आहे . सरकार ने सुटाबुटावरिल लक्ष ग्रामीण भागावर केंद्रीत केले आहे ही चांगली बाब आहे कारण मागचा काही वर्षांचा आपण पाठपुरावा केला तर शहरी भागाचा जेवढ्या झपाट्याने विकास होतोय तेवढाच ग्रामीण भाग जास्त मागास होत चालला आहे ..

                    दुसरीकडे "कार्पोरेट" जगत या अर्थसंकल्पावर प्रचंड नाराज असल्याच्या बातम्या वाचायला मिळत आहेत . आता या "कार्पोरेट" लोकांबाबत बोलायचं झालं तर हे कोणत्याच अर्थसंकल्पावर कधीच खुश नसतात . कारण या लोकांची पोटं एवढी मोठी आहेत की त्यांच्या पोटात सगळा देश जरी टाकला तरीही भरपुर जागा रिकामीच राहील .

                 ही गोष्ट मानावी लागेल की अर्थसंकल्पामुळे मध्यमवर्गीय समुह नाराज आहे. हा समुह मनाने तर उच्च वर्गात प्रवेश करायला पाहातोय परंतु त्यासाठी त्याचा खिसा तेवढा जड नाही . या वर्गाला आशा होती की जेटली त्यांना करात सुट देतील परंतु त्यांची घोर निराशा झाली आहे... मध्यमवर्गीय नौकरदार समुह तर सातव्या वेतन आयोगाचे मिळणारे संभावित 'एरियर' सुध्दा 'इन्कम टॅक्स' भरण्यात जाते की काय अशा चिंतेत आहे..

                  असो ही तर शंका झाली . आपल्या आणि मोदींच्या सुदैवाने पेट्रोलियम पदार्थांचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमी झाले आहेत नाहीतर संपूर्ण अर्थसंकल्पावर त्याचा परिणाम दिसुन आला असता ...सध्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात दुष्काळ जरी असला तरी न्युज चॅनल्स वर बजेट चर्चांचा सुकाळ आहे . चर्चांमध्ये असे काही विधान ऐकायला मिळतात कि ज्यामुळे काहीही न खाता झोप यायला लागलीय . त्यातच अर्ध्या रात्री  जाग आली आणि वाढत्या महागाईचा विचार आला तर झोप पण मोदींच्या विदेशात जाणार्‍या विमानाप्रमाणे निघुन जाते... 

-------● संदीप प्रभाकर नागरगोजे, गंगाखेड ●--------

Comments

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

*भगवानगडाचे गद्दार मंबाजी*

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य  निर्माण केलं पण त्यासाठी पोषक वातावरण हे शिवजन्मापुर्वीच्या संतांनी केलं होतं. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत सर्वांनीच कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून लोकपदेश करत समाज जागृती केली . जाती व्यवस्थेत वाटल्या गेलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे पुण्यकार्य केले . ज्याचे फळ  अठरापगड जाती धर्मातील लोकांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला स्वराज्यानिर्मीतीच्या कार्यात झोकून दिले ; प्रसंगी स्वराज्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली . शिवाजीराजाला कधी न बघितलेली लोक पण त्या राजावर जिव ओवाळून टाकण्यासाठी तत्पर असत.  कारण शिवाजी राजाच्या कार्याची महती सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य तुकारामांसारख्या संतानी केले आणि समाजात स्वराज्याविषयी  आस्था आणि आपलेपणाची भावना निर्माण केली . स्वतः शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊनी अनेकवेळा अशा अनेकांचे सत्कार केले . संत तुकारामांची ख्याती ऐकून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सत्कार स्वीकारण्यासाठी राजदरबारी येण्याचे आवाहन केले होते . पण तुकारामांनी ते प्रांजळपणे नाकारले ह...