Skip to main content

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे .

महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण सुध्दा केले जात आहे.  महाराष्ट्र भाजपातील सर्वात जास्त जनाधार असलेल्या प्रभावशाली लोकनेत्या म्हणून अल्पावधीत त्यांनी स्वतःला सिध्द केले आहे . याचा साधक परिणाम म्हणून त्यांना जसा फायदा झाला तसा बाधक परिणाम म्हणून त्यांच्यावर खोटे आरोप सुध्दा झाले परंतु या खोट्या आरोपांचा त्यांना राजकीय दृष्टीने खंबीर होण्यासाठी फायदा सुध्दा झाला आहे . असो , पंकजाताई या मुंडे साहेब हयात असतानाच राजकीय दृष्ट्या सक्रिय होत्या . परंतु साहेबांच्या जाण्यानंतर अपघाताने राजकारणात आलेल्या खासदार डाॅ.प्रितमताई सुध्दा आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नंतर अपघाताने राजकारणात आलेल्या खासदार डाॅ.प्रितमताई यांनी बर्‍याच राजकीय विश्लेषकांचे अंदाज अक्षरशः खोटे ठरवले आहेत . देशाच्या इतिहासातील लोकसभेत विजय मिळवण्याचे सर्वच्या सर्व विक्रम पदार्पणातच मोडून काढत आजवरच्या सर्वाधिक मते मिळवून आणि सर्वाधिक फरकाने विजय मिळवून लोकसभेत जाण्याचा विश्वविक्रम करत लोकसभेत पोहोचलेल्या खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे यांच्या समोर खुप मोठे आव्हान होते. कारण , मुंडे साहेबांचा वारसा खुप मोठा होता आणि साहजिकच त्यामुळे लोकांच्या अपेक्षा सुध्दा राजकारणात नवख्या असलेल्या प्रितमताईंवर खुप जास्त होत्या .

मुंडे साहेबांनी नेहमीच लोकसभेत शेतकरी , शोषित,  वंचित बहुजन समाजाच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचे काम केले होते आणि म्हणून देशभरातील बहुजन समाजाने त्यांना आपला नेता मानलं होतं . आणि खा.डाॅ.प्रितमताईंवर या सर्व अपेक्षांचे ओझं होतं , जे त्यांनी लीलया अतिशय चांगल्याप्रकारे पेलले आहे असे म्हणता येते .


सत्ताधारी पक्षाच्या खासदार असताना सुध्दा त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि सामाजिक प्रश्नांवर लोकसभेत नेहमीच आवाज उठवला आहे . तर सत्तेचा फायदा जास्तीत जास्त प्रमाणात कसा करता येईल या दृष्टीने विचार करत आज महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांच्या तुलनेने सर्वाधिक जास्त निधी बीड जिल्ह्यात खेचून आणला आहे . अनेक दशकांपासून बीड जिल्ह्य़ातील लोकांचे स्वप्न असलेल्या रेल्वेचा प्रश्न जवळपास मुंडे भगिनींनी निकाली लावला आहे.

शांत आणि प्रांजळ स्वभावाच्या खासदार प्रितमताईंची काम करण्याची पध्दत अतिशय वेगळी आहे . एखादे काम हाती घेतल्यानंतर ते संपूर्ण निकाली लागेपर्यंत ताई त्याचा पाठपुरावा करणे सोडत नाहीत. बीड रेल्वे साठी त्यांनी वारंवार केलेला पाठपुरावा हे त्याचे एक उदाहरण म्हणता येईल . मागच्या वेळी परळीत स्वतः तात्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे यांचे केलेले कौतुक त्यांच्या कार्याचे प्रमाणपत्र आहे .


आज खासदार डाॅ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांचा वाढदिवस,  मुंडे साहेब गेल्यापासून प्रथमच साजरा करण्यात येत आहे . फक्त लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांची मुलगी एवढीच ओळख न ठेवता आपले एक वेगळे अढळ स्थान निर्माण करणार्‍या   अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे यांना उदंड आयुष्य लाभो आणि लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी इश्वर त्यांना शक्ती देवो हिच इश्वरचरणी प्रार्थना.

शेवटी संत तुकारामांचा अभंग आठवतो...

आपोलिया हिता , जो असे जागता !!
धन्य माता पिता , तयाचिया !!
कुळी कन्या पुत्र,  होती जे सात्विक !!
तयाचा हरीक , वाटे देवा !!


- संदीप नागरगोजे, गंगाखेड

Comments

Popular posts from this blog

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

*भगवानगडाचे गद्दार मंबाजी*

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य  निर्माण केलं पण त्यासाठी पोषक वातावरण हे शिवजन्मापुर्वीच्या संतांनी केलं होतं. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत सर्वांनीच कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून लोकपदेश करत समाज जागृती केली . जाती व्यवस्थेत वाटल्या गेलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे पुण्यकार्य केले . ज्याचे फळ  अठरापगड जाती धर्मातील लोकांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला स्वराज्यानिर्मीतीच्या कार्यात झोकून दिले ; प्रसंगी स्वराज्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली . शिवाजीराजाला कधी न बघितलेली लोक पण त्या राजावर जिव ओवाळून टाकण्यासाठी तत्पर असत.  कारण शिवाजी राजाच्या कार्याची महती सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य तुकारामांसारख्या संतानी केले आणि समाजात स्वराज्याविषयी  आस्था आणि आपलेपणाची भावना निर्माण केली . स्वतः शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊनी अनेकवेळा अशा अनेकांचे सत्कार केले . संत तुकारामांची ख्याती ऐकून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सत्कार स्वीकारण्यासाठी राजदरबारी येण्याचे आवाहन केले होते . पण तुकारामांनी ते प्रांजळपणे नाकारले ह...