Skip to main content

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते .

मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले .

सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका लक्षात घेता संत तुकारामांनी " जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले , तोची साधु ओळखावा , देव तेथेची जाणावा " म्रदु सभाव्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त " अशी साधुची व्याख्याच सांगितली आहे ..

 आज आपण ज्यांना " संत " पदवी देतोय त्यांचे उद्योग काय सुरु असतात याकडे कुणी लक्ष देण्याचे कष्ट का घेत नसावे .
 संताची व्याख्या " तेची संत  तेची संत , ज्यांचा हेत विठ्ठल "
मग या व्याख्येत आज कालचे कोणते साधु बसतील ? अशिक्षीत लोकांच सोडा परंतु सुशिक्षीत लोकांनाही जर भगवतगीता वाचण्याते कष्ट घ्यायचे नसतील तर फक्त भामट्या साधुंनाच दोष देण्यात अर्थ काय ?

आमचं तर दुर्दैव हे आहे कि इतर धर्मात लोकं जेवढं शिकतील तेवढेच धार्मिक होतात परंतु याऊलट आम्ही जेवढं शिकाल तेवढं आमच्या धार्मिक शिकवणीपासुन आम्ही दुर जातो ( अर्थातच ज्याच त्याला स्वातंत्र्य राज्यघटनेनं दिलेल आहेच ) आमच्या संताना अभ्यासण्यात आम्हाला कमीपणा वाटतो . त्यांना मानने म्हणजे आम्हाला अंधश्रध्दावादी ठरवले जाते परंतु त्या संतांची व्यापक विचारसरणी काय सांगते यांच्याकडे पाहीलंच जात नाही .
 पाप-पुण्य या पुरातन रुढीवादी शब्दांची आमच्या संतांनी जी आधुनिक व्याख्या उदाहरणादाखल सांगता येईल .
" पुण्य ते परोपकार , पाप ते परपीडा " या अभंगातुन संताची शिकवण काय ते सांगता येईल . या सर्वांचाच परिपाक कि आजकाल अशा भामट्या साधुंचा सुळसुळाट झालेला सांगता येईल .

धर्माला वाईट म्हणुन धर्माला नावं ठेवत बसण्यापेक्षा धर्माचा अर्थ काय हे स्वत: जाणुन घेवुन इतरांना थोडफार सांगितलं तर आश्रमात यौनशोशन , मशीदीत बलात्कार , चर्चमध्ये अत्याचार अशा घटना पहायला नाही मिळणार .

खरं तर अशा भामट्या साधुंसाठी कडक असा कायदा करण्याची गरज आहे , कायदे नाहीत यातला प्रकार नाहीच परंतु आमच्या कडे कायदा तेवढ्या पळवाटा आहेत . कायदा तयार होण्या आगोदर त्याच्या पळवाटा किती आणि कशा याचा विचार आगोदर केला जातो . हे बदलण्यासाठी प्रचंड राजकिय इच्छाशक्तीची गरज आहे परंतु आमचे नेतेच या साधुंचे " महत्वाचे शिष्य " असतात .

असो माऊलींच्या पसायदानाप्रमाणे " दुरितांचे तिमीर जावो , विश्व स्वधर्म सुर्य पाहो , जो जे वांच्छील तो ते लाहो , प्राणीजात " असं प्रत्यक्षात येवो हिच इच्छा .

:- संदीप प्रभाकर नागरगोजे , गंगाखेड 

Comments

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

*भगवानगडाचे गद्दार मंबाजी*

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य  निर्माण केलं पण त्यासाठी पोषक वातावरण हे शिवजन्मापुर्वीच्या संतांनी केलं होतं. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत सर्वांनीच कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून लोकपदेश करत समाज जागृती केली . जाती व्यवस्थेत वाटल्या गेलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे पुण्यकार्य केले . ज्याचे फळ  अठरापगड जाती धर्मातील लोकांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला स्वराज्यानिर्मीतीच्या कार्यात झोकून दिले ; प्रसंगी स्वराज्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली . शिवाजीराजाला कधी न बघितलेली लोक पण त्या राजावर जिव ओवाळून टाकण्यासाठी तत्पर असत.  कारण शिवाजी राजाच्या कार्याची महती सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य तुकारामांसारख्या संतानी केले आणि समाजात स्वराज्याविषयी  आस्था आणि आपलेपणाची भावना निर्माण केली . स्वतः शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊनी अनेकवेळा अशा अनेकांचे सत्कार केले . संत तुकारामांची ख्याती ऐकून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सत्कार स्वीकारण्यासाठी राजदरबारी येण्याचे आवाहन केले होते . पण तुकारामांनी ते प्रांजळपणे नाकारले ह...