सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते .
मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला . कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले .
सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका लक्षात घेता संत तुकारामांनी " जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले , तोची साधु ओळखावा , देव तेथेची जाणावा " म्रदु सभाव्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त " अशी साधुची व्याख्याच सांगितली आहे ..
आज आपण ज्यांना " संत " पदवी देतोय त्यांचे उद्योग काय सुरु असतात याकडे कुणी लक्ष देण्याचे कष्ट का घेत नसावे .
संताची व्याख्या " तेची संत तेची संत , ज्यांचा हेत विठ्ठल "
मग या व्याख्येत आज कालचे कोणते साधु बसतील ? अशिक्षीत लोकांच सोडा परंतु सुशिक्षीत लोकांनाही जर भगवतगीता वाचण्याते कष्ट घ्यायचे नसतील तर फक्त भामट्या साधुंनाच दोष देण्यात अर्थ काय ?
आमचं तर दुर्दैव हे आहे कि इतर धर्मात लोकं जेवढं शिकतील तेवढेच धार्मिक होतात परंतु याऊलट आम्ही जेवढं शिकाल तेवढं आमच्या धार्मिक शिकवणीपासुन आम्ही दुर जातो ( अर्थातच ज्याच त्याला स्वातंत्र्य राज्यघटनेनं दिलेल आहेच ) आमच्या संताना अभ्यासण्यात आम्हाला कमीपणा वाटतो . त्यांना मानने म्हणजे आम्हाला अंधश्रध्दावादी ठरवले जाते परंतु त्या संतांची व्यापक विचारसरणी काय सांगते यांच्याकडे पाहीलंच जात नाही .
पाप-पुण्य या पुरातन रुढीवादी शब्दांची आमच्या संतांनी जी आधुनिक व्याख्या उदाहरणादाखल सांगता येईल .
" पुण्य ते परोपकार , पाप ते परपीडा " या अभंगातुन संताची शिकवण काय ते सांगता येईल . या सर्वांचाच परिपाक कि आजकाल अशा भामट्या साधुंचा सुळसुळाट झालेला सांगता येईल .
धर्माला वाईट म्हणुन धर्माला नावं ठेवत बसण्यापेक्षा धर्माचा अर्थ काय हे स्वत: जाणुन घेवुन इतरांना थोडफार सांगितलं तर आश्रमात यौनशोशन , मशीदीत बलात्कार , चर्चमध्ये अत्याचार अशा घटना पहायला नाही मिळणार .
खरं तर अशा भामट्या साधुंसाठी कडक असा कायदा करण्याची गरज आहे , कायदे नाहीत यातला प्रकार नाहीच परंतु आमच्या कडे कायदा तेवढ्या पळवाटा आहेत . कायदा तयार होण्या आगोदर त्याच्या पळवाटा किती आणि कशा याचा विचार आगोदर केला जातो . हे बदलण्यासाठी प्रचंड राजकिय इच्छाशक्तीची गरज आहे परंतु आमचे नेतेच या साधुंचे " महत्वाचे शिष्य " असतात .
असो माऊलींच्या पसायदानाप्रमाणे " दुरितांचे तिमीर जावो , विश्व स्वधर्म सुर्य पाहो , जो जे वांच्छील तो ते लाहो , प्राणीजात " असं प्रत्यक्षात येवो हिच इच्छा .
:- संदीप प्रभाकर नागरगोजे , गंगाखेड
मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला . कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले .
सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका लक्षात घेता संत तुकारामांनी " जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले , तोची साधु ओळखावा , देव तेथेची जाणावा " म्रदु सभाव्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त " अशी साधुची व्याख्याच सांगितली आहे ..
आज आपण ज्यांना " संत " पदवी देतोय त्यांचे उद्योग काय सुरु असतात याकडे कुणी लक्ष देण्याचे कष्ट का घेत नसावे .
संताची व्याख्या " तेची संत तेची संत , ज्यांचा हेत विठ्ठल "
मग या व्याख्येत आज कालचे कोणते साधु बसतील ? अशिक्षीत लोकांच सोडा परंतु सुशिक्षीत लोकांनाही जर भगवतगीता वाचण्याते कष्ट घ्यायचे नसतील तर फक्त भामट्या साधुंनाच दोष देण्यात अर्थ काय ?
आमचं तर दुर्दैव हे आहे कि इतर धर्मात लोकं जेवढं शिकतील तेवढेच धार्मिक होतात परंतु याऊलट आम्ही जेवढं शिकाल तेवढं आमच्या धार्मिक शिकवणीपासुन आम्ही दुर जातो ( अर्थातच ज्याच त्याला स्वातंत्र्य राज्यघटनेनं दिलेल आहेच ) आमच्या संताना अभ्यासण्यात आम्हाला कमीपणा वाटतो . त्यांना मानने म्हणजे आम्हाला अंधश्रध्दावादी ठरवले जाते परंतु त्या संतांची व्यापक विचारसरणी काय सांगते यांच्याकडे पाहीलंच जात नाही .
पाप-पुण्य या पुरातन रुढीवादी शब्दांची आमच्या संतांनी जी आधुनिक व्याख्या उदाहरणादाखल सांगता येईल .
" पुण्य ते परोपकार , पाप ते परपीडा " या अभंगातुन संताची शिकवण काय ते सांगता येईल . या सर्वांचाच परिपाक कि आजकाल अशा भामट्या साधुंचा सुळसुळाट झालेला सांगता येईल .
धर्माला वाईट म्हणुन धर्माला नावं ठेवत बसण्यापेक्षा धर्माचा अर्थ काय हे स्वत: जाणुन घेवुन इतरांना थोडफार सांगितलं तर आश्रमात यौनशोशन , मशीदीत बलात्कार , चर्चमध्ये अत्याचार अशा घटना पहायला नाही मिळणार .
खरं तर अशा भामट्या साधुंसाठी कडक असा कायदा करण्याची गरज आहे , कायदे नाहीत यातला प्रकार नाहीच परंतु आमच्या कडे कायदा तेवढ्या पळवाटा आहेत . कायदा तयार होण्या आगोदर त्याच्या पळवाटा किती आणि कशा याचा विचार आगोदर केला जातो . हे बदलण्यासाठी प्रचंड राजकिय इच्छाशक्तीची गरज आहे परंतु आमचे नेतेच या साधुंचे " महत्वाचे शिष्य " असतात .
असो माऊलींच्या पसायदानाप्रमाणे " दुरितांचे तिमीर जावो , विश्व स्वधर्म सुर्य पाहो , जो जे वांच्छील तो ते लाहो , प्राणीजात " असं प्रत्यक्षात येवो हिच इच्छा .
:- संदीप प्रभाकर नागरगोजे , गंगाखेड
Comments
Post a Comment