राजकारणाचे जाळं फारच किचकट असतं . या जाळ्यात साधारणपणे फक्त लहाण मासे च गळाला लागत असतात आणि मोठमोठे मगरमच्छ मात्र हे जाळं कुरतडून पसार होत असतात . ते मगरमच्छ जाळं कुरतडण्याएवढे पावर फुल असतात की सत्तेत बसलेले काही त्यांचे दोस्त त्यांना त्याकामी विशेष सहाय्य करतात हा संशोधनाचा विषय आहे .
ज्याप्रमाणे माल्यावर आपल्या देशातील बँका उदार होऊन महारथी कर्णाप्रमाणे कर्जाची उधळण करत होत्या त्याप्रमाणे आम्हाला आमचा किराणा दुकान वाला दुकानदार सुध्दा उधारी देत नाही . माल्याची ग्लॅमर जीवन पध्दती बघुन अनेक लोकांना त्याचा हेवा वाटत असेल . जेव्हा माल्या विश्वातील वेगवेगळ्या विश्वसुंदर्यांना बगलेत घेवुन बसायचा त्यांच्यावर यथेच्छ उधळण करायचा ते देशातील नागरिकांना सहज नजरेस पडायचे परंतु ही बाब देशातील कोणत्याही राजकारणी , मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानाच्या डोळ्यांना दिसली नाही .
माल्याची विमानकंपनी डबघाईला येवुन तिचं दिवाळं निघालं असताना देखील बँकांनी त्याच्यावर कर्जाची उधळण सुरूच ठेवली होती आणि आता जेंव्हा तो फरार झालाय तेंव्हा सर्वच एकमेकांच्या सुरात सुर लावुन बोंबा ठोकायला लागले आहेत .
आपले अर्थमंत्री सांगतात कि माल्याला कर्ज काँग्रेसच्या काळात भेटले . ते मान्य सुध्दा आहे . पण मंत्री महोदय माल्या तुमच्या नाकावर टिच्चून पळाला त्याचं काय ?
भारतातील सर्वसामान्य नागरिक जेंव्हा घरासाठी कर्ज काढायला बँकेच्या चकरा मारतो तेंव्हा बँकेवाले त्याच्याकडे असं बघतात जसं त्या व्यक्तीचा कर्ज घ्यायचा आणि त्यावर ऐश करून कर्ज बुडवण्याचा खानदानी व्यवसायच तो व्यक्ती करतो ..
असो बाकीच्यांचे सोडा मात्र ५६ इंचाची छाती असलेल्या पंतप्रधानांकडुन तरी हि अपेक्षा नव्हती. मी जनतेच्या घराचा चौकीदार बनुन राहील असं म्हणणार्या प्रधानसेवका समोरून हा माल्या रूपी डोमकावळा फरार झाला तरी प्रधानसेवक काहीच करू शकले नाहीत. माल्या डोमकावळा होवुन उडून जात असताना हे चौकीदार महाशय झोप घेत होते की श्री श्री श्रींच्या कार्यक्रमात जास्तच तल्लीन झाले होते काही कळायला मार्ग नाही.
- संदीप नागरगोजे, गंगाखेड
Comments
Post a Comment