Skip to main content

कावळा उडे .... भुर्रर्रर्र ...

राजकारणाचे जाळं फारच किचकट असतं . या जाळ्यात साधारणपणे फक्त लहाण मासे च गळाला लागत असतात आणि मोठमोठे मगरमच्छ मात्र हे जाळं कुरतडून पसार होत असतात . ते मगरमच्छ जाळं कुरतडण्याएवढे पावर फुल असतात की सत्तेत बसलेले काही त्यांचे दोस्त त्यांना त्याकामी विशेष सहाय्य करतात हा संशोधनाचा विषय आहे .

ज्याप्रमाणे माल्यावर आपल्या देशातील बँका उदार होऊन महारथी कर्णाप्रमाणे कर्जाची उधळण करत होत्या त्याप्रमाणे आम्हाला आमचा किराणा दुकान वाला दुकानदार सुध्दा उधारी देत नाही . माल्याची ग्लॅमर जीवन पध्दती बघुन  अनेक लोकांना  त्याचा हेवा वाटत असेल . जेव्हा माल्या विश्वातील वेगवेगळ्या विश्वसुंदर्यांना बगलेत घेवुन बसायचा त्यांच्यावर यथेच्छ उधळण करायचा ते देशातील नागरिकांना सहज नजरेस पडायचे परंतु ही बाब देशातील कोणत्याही राजकारणी , मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानाच्या डोळ्यांना दिसली नाही .

माल्याची विमानकंपनी डबघाईला येवुन तिचं दिवाळं निघालं असताना देखील बँकांनी त्याच्यावर कर्जाची उधळण सुरूच ठेवली होती आणि आता जेंव्हा तो फरार झालाय तेंव्हा सर्वच एकमेकांच्या सुरात सुर लावुन बोंबा ठोकायला लागले आहेत .

आपले अर्थमंत्री सांगतात कि माल्याला कर्ज काँग्रेसच्या काळात भेटले . ते मान्य सुध्दा आहे . पण मंत्री महोदय माल्या तुमच्या नाकावर टिच्चून पळाला त्याचं काय ?

भारतातील सर्वसामान्य नागरिक जेंव्हा घरासाठी कर्ज काढायला बँकेच्या चकरा मारतो तेंव्हा बँकेवाले त्याच्याकडे असं बघतात जसं त्या व्यक्तीचा कर्ज घ्यायचा आणि त्यावर ऐश करून कर्ज बुडवण्याचा खानदानी व्यवसायच तो व्यक्ती करतो ..

असो बाकीच्यांचे सोडा मात्र ५६ इंचाची छाती असलेल्या पंतप्रधानांकडुन तरी हि अपेक्षा नव्हती. मी जनतेच्या घराचा चौकीदार बनुन राहील असं म्हणणार्‍या प्रधानसेवका समोरून हा माल्या रूपी डोमकावळा फरार झाला तरी प्रधानसेवक काहीच करू शकले नाहीत. माल्या डोमकावळा होवुन उडून जात असताना हे चौकीदार महाशय झोप घेत होते की श्री श्री श्रींच्या कार्यक्रमात जास्तच तल्लीन झाले होते काही कळायला मार्ग नाही.

- संदीप नागरगोजे, गंगाखेड

Comments

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

*भगवानगडाचे गद्दार मंबाजी*

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य  निर्माण केलं पण त्यासाठी पोषक वातावरण हे शिवजन्मापुर्वीच्या संतांनी केलं होतं. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत सर्वांनीच कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून लोकपदेश करत समाज जागृती केली . जाती व्यवस्थेत वाटल्या गेलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे पुण्यकार्य केले . ज्याचे फळ  अठरापगड जाती धर्मातील लोकांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला स्वराज्यानिर्मीतीच्या कार्यात झोकून दिले ; प्रसंगी स्वराज्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली . शिवाजीराजाला कधी न बघितलेली लोक पण त्या राजावर जिव ओवाळून टाकण्यासाठी तत्पर असत.  कारण शिवाजी राजाच्या कार्याची महती सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य तुकारामांसारख्या संतानी केले आणि समाजात स्वराज्याविषयी  आस्था आणि आपलेपणाची भावना निर्माण केली . स्वतः शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊनी अनेकवेळा अशा अनेकांचे सत्कार केले . संत तुकारामांची ख्याती ऐकून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सत्कार स्वीकारण्यासाठी राजदरबारी येण्याचे आवाहन केले होते . पण तुकारामांनी ते प्रांजळपणे नाकारले ह...