Skip to main content

महापुरुषांच्या नावे राजकारण कधी थांबणार ?

पुन्हा एकदा बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे. दलितांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याबद्दल काशीराम यांना भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे. बसपा अध्यक्ष मायावती नेहमीप्रमाणे हि मागणी जोरदार पणे रेटण्यात सर्वात पुढे आहेत .

हि मागणी करत असताना त्यांनी भाजपा , काँग्रेस सह इतर सर्वच पक्षांवर गंभीर आरोप करताना सांगितले की भाजपा , काँग्रेस आणि इतर सर्वांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि काशीराम यांचा फक्त मतं मिळवण्यासाठी वापर केला आहे आणि हे पक्ष फक्त मतांसाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि काशीराम यांच्या जंयत्या साजऱ्या करतात . याचाच अर्थ असा होतो की मायावती यांना सरळ - सरळ हेच सांगायचं आहे की आंबेडकर आणि काशीराम यांच्या जयंती साजऱ्या करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त त्यांनाच आहे ...

दलितांच्या उत्थानासाठी केलेले काशीराम यांचे कार्य कुणीही नाकारू शकत नाही.  परंतु स्वतःला काशीराम यांची वारसदार म्हणवून घेणार्‍या मायावतींनी दलितांसाठी काय केले हे कुणालाही ठाऊक नाही .

देशातील सर्वात मोठं आणि केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी सर्वात महत्वपूर्ण असलेल्या उत्तर प्रदेश सारख्या राज्याने काशीराम यांच्यावरील प्रेमापोटी त्यांच्या राजकिय वारसदार मायावतींना चार वेळा मुख्यमंत्री केलं परंतु मायावती मुख्यमंत्री होवुन सुध्दा युपीतील दलितांचे हाल काही सुधारले नाहीत . मायावती सत्तेत असताना सुध्दा दलितांवरील अत्याचार कमी झाले नाहीत ...

दलितांची मते मिळवण्यासाठी भले ही मायावतींनी कोणत्याही पक्षावर आरोप केले असतील परंतु प्रत्यक्षात सत्य हे आहे कि चार वेळा मुख्यमंत्री बनण्याचा फायदा उत्तर प्रदेशात कोणाला जर झाला असेल तर तो स्वतः मायावतींना झाला आहे. राजकारणात येण्यापूर्वी एका शाळेत शिक्षिका असलेल्या मायावतींचे नाव आज  देशातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांमध्ये घेतल्या जाते . चार वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत अर्ज दाखल करते वेळी मायावतींची १११ कोटींची संपत्ती होती , ती आज चार वर्षांनंतर निश्चीतच वाढलेली असणार आहे.

मायावतींनी हि संपत्ती कशाप्रकारे कमावली याविषयी मायावतींनी कधीही माहीती दिलेली नाही . देशाला नाही सांगितलं तरी चालेल परंतु किमान भारतातील दलितांना तरी त्यांचा हा श्रीमंत होण्याचा फाॅर्मुला कळायला हवा ..

काशीराम यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्याचा मायावतींना संपुर्ण अधिकार आहेच   त्यांनी या मागणीबरोबरच दलितांच्या विकासासाठी मागणी करावी सुध्दा.  परंतु फक्त मागणी करत इतरांना दोष देण्यापेक्षा सत्तेत आल्यानंतर कृती सुध्दा करावी .. मायावतींना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि काशीराम यांच्या विषयी खरंच श्रध्दा असेल तर त्यांनी या महापुरुषांच्या नावाचा वापर स्वतःची राजकिय पोळी भाजण्यासाठी करू नये .महापुरुष हे सर्व जाती धर्मांचे असतात त्यांच्या विचारांचा प्रसार करता येत नसेल तर किमान त्यांना मर्यादित करण्यात हातभार लावू नये.

•▪ संदीप नागरगोजे, गंगाखेड ▪•

Comments

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

*भगवानगडाचे गद्दार मंबाजी*

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य  निर्माण केलं पण त्यासाठी पोषक वातावरण हे शिवजन्मापुर्वीच्या संतांनी केलं होतं. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत सर्वांनीच कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून लोकपदेश करत समाज जागृती केली . जाती व्यवस्थेत वाटल्या गेलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे पुण्यकार्य केले . ज्याचे फळ  अठरापगड जाती धर्मातील लोकांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला स्वराज्यानिर्मीतीच्या कार्यात झोकून दिले ; प्रसंगी स्वराज्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली . शिवाजीराजाला कधी न बघितलेली लोक पण त्या राजावर जिव ओवाळून टाकण्यासाठी तत्पर असत.  कारण शिवाजी राजाच्या कार्याची महती सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य तुकारामांसारख्या संतानी केले आणि समाजात स्वराज्याविषयी  आस्था आणि आपलेपणाची भावना निर्माण केली . स्वतः शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊनी अनेकवेळा अशा अनेकांचे सत्कार केले . संत तुकारामांची ख्याती ऐकून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सत्कार स्वीकारण्यासाठी राजदरबारी येण्याचे आवाहन केले होते . पण तुकारामांनी ते प्रांजळपणे नाकारले ह...