Skip to main content

नामांतर चळवळ आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे

२१ एप्रिल १९९४ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत एका ऐतिहासिक विधेयकावर चर्चा सुरू होती .
हे विधेयक यासाठी ऐतिहासिक होते की  फक्त मराठवाड्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील शोषित बहुजन समाजाची एक भावना होती की औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले जावे .
संपूर्ण सभागृहात सर्वत्र शांतता होती , नामातंर चळवळीस मराठवाडय़ात उग्र रूप प्राप्त झाले होते .मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे का गरजेचं आहे या विषयी सभागृहात एक आवाज घुमत होता.
सर्व सदस्य शांतपणे महाराष्ट्राच्या या तरुण जिगरबाज योध्द्याचे भाषण ऐकत होते. तो आवाज होता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा .

आपल्या भाषणात ते म्हणतात
"भारतीय राज्यघटनेने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य सामान्य, शोषित, दलित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. समाजातील भेदभाव , अस्पृश्यता या विरोधात आवाज उठवाला . समाजातील आर्थिक विषमता दुर करण्यासाठी प्रयत्न केले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर या शोषित समाजाला न्याय मिळाला नसता .. मराठवाड्या सारखा मागासलेला भाग शैक्षणिक दृष्ट्या हजारो मैल दुर गेला असता ".

मराठवाड्याच्या विकासासाठी तात्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते २३ आॅगस्ट १९५८ साली विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती.
त्यावेळीच मराठवाडा विद्यापीठाला आंबेडकरांचे नाव देण्यात यावे यासंबंधी काही प्रस्ताव आले होते. आंबेडकर यांच्या बरोबरच संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि स्वामी रामानंद तीर्थ इत्यादी महापुरुषांची नावे सुध्दा चर्चेत होती .
यावेळी माय मराठी चा जन्म या भागात झाला म्हणून विद्यापीठास "मराठवाडा विद्यापीठ " असे नाव देण्याचा निर्णय घेतला होता.

नामांतर चळवळीशी मुंडे साहेबांची नाळ फार पुर्वी पासून जोडली गेली होती.
वास्तविक पाहता लोकनेते गोपीनाथराव मुंडे विद्यार्थी चळवळीपासूनच नामांतर चळवळीशी निगडीत होते .
नामातंराचा विषय ज्या वेळी धगधगता होता तेंव्हा  इ.स.१९८०  मधील प्रसिद्ध लाँगमार्च ज्याचं नेतृत्व प्रा.जोगेंद्र कवाडे , बाबा आढाव करत होते त्यात राजकिय मतभेद बाजूला ठेवून गोपीनाथराव मुंडे सहभागी झाले होते .
मुंडे साहेबांना १९७९ रोजी नाशिक येथे नामातंर चळवळीत अटक करण्यात आली होती.
त्यानंतर ही १९८३ दलित पँथर ने नामातंर चळवळीसाठी सत्याग्रहाचा आवाज दिला . त्यावेळी त्यास जाहीर पाठिंबा देणारे मुंडे साहेब भाजपचे मराठवाड्यातील एकमेव आमदार होते .

नामातंर साठी जेलभरो आंदोलनात आठवले यांच्या सोबत ही मुंडे साहेब आघाडीवर होते .या विषयी रामदास आठवले सांगतात कि
" मुंडे साहेब केवळ विचारांच्या पातळीवर पक्षात वावरले नाहीत तर सर्वसामान्य, बहुजन आणि दलित समूहाच्या भावभावनांशी नाळ जुळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.  नामातंर साठी आम्ही जो संघर्ष केला त्यात मुंडे साहेब सर्व शक्तीने सहभागी झाले आणि येरवडा कारागृहात १४ दिवस तुरुंगवास भोगला"

त्यावेळी नामातंर वादी आणि नामातंर विरोधी असे दोन प्रवाह होते . आंबेडकरांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्यात यावे अशी भुमिका काहींनी सभागृहात मांडली त्यावेळी आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यायला हवे अशी ठाम भूमिका मुंडे साहेबांनी घेतली . यावर बोलताना ते म्हणाले कि ""शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्यात बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालय सुरू केले त्यामुळे शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितले होते की नागपूर, मुंबई या ठिकाणी आपण महाविद्यालय काढतो पण मराठवाडा मागासलेला विभाग आहे. मागासलेला लोकांना शिक्षणाची संधी मिळाली पाहीजे म्हणून महाविद्यालय सुरू केले ".

१४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाला "" डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ "" असे नाव दिल्याची घोषणा केली गेली आणि महाराष्ट्रात नामातंराच्या श्रेयासंबंधी उलट सुलट चर्चा सुरू झाली.. परंतु प्रत्यक्षात नामातंर चे श्रेय हे मराठवाड्यातील जनतेचे आहे असे स्पष्ट मत मुंडे साहेबांनी मांडले.. 
विद्यापीठाला आंबेडकरांचे नाव दिल्याने मराठवाड्याची आस्मिता कमी होईल म्हणणारे नेते नामातंर चे श्रेय घेण्याची घिसाडघाई करत होते आणि मुंडे साहेब मात्र नामातंर चे श्रेय  मराठवाड्यातील जनतेला देत होते .  आंबेडकरांचे नाव विद्यापीठाला दिल्याने आज मराठवाडा गौरवांकीत झाला आहे असे उद्गार त्यावेळी साहेबांनी काढले होते.
 
नामांतराची स्विकारार्हता वाढवण्यासाठी  १९९३ ला संपूर्ण मराठवाड्याच्या दौरा करून मराठवाड्यातील जेष्ठ नेते , लोकप्रतिनिधी समाजसेवक, राजकिय पक्ष, विवीध सेवाभावी संस्था आणि नागरिकांशी चर्चा करून मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले जावे यासंबंधी चा प्रस्ताव १३ डिसेंबर  १९९३ रोजी मांडला होता.

मराठवाडय़ात जातीय तणाव निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून मराठवाडय़ात फिरलेले विरोधी पक्षनेते गोपीनाथराव मुंडे हे होते.
विवेकी विरोधकाचे हे उदाहरण आजच्या महाराष्ट्रात लोप पावल्याचे धडधडीत दिसत असुन केवळ मुंडेच्या पश्चात त्यांच्या वारशाच्या धास्तिपोटी अविवेकी विरोध करण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदाचा ऊपयोग होताना दिसतोय.

बहुजनांच्या सन्मानासाठी पद पक्ष प्रतिष्ठा पणाला लावून झगडणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या  नामांतरस्तंभावर कोरलेलं नाव हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे.

संदीप नागरगोजे , गंगाखेड


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

*भगवानगडाचे गद्दार मंबाजी*

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य  निर्माण केलं पण त्यासाठी पोषक वातावरण हे शिवजन्मापुर्वीच्या संतांनी केलं होतं. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत सर्वांनीच कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून लोकपदेश करत समाज जागृती केली . जाती व्यवस्थेत वाटल्या गेलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे पुण्यकार्य केले . ज्याचे फळ  अठरापगड जाती धर्मातील लोकांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला स्वराज्यानिर्मीतीच्या कार्यात झोकून दिले ; प्रसंगी स्वराज्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली . शिवाजीराजाला कधी न बघितलेली लोक पण त्या राजावर जिव ओवाळून टाकण्यासाठी तत्पर असत.  कारण शिवाजी राजाच्या कार्याची महती सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य तुकारामांसारख्या संतानी केले आणि समाजात स्वराज्याविषयी  आस्था आणि आपलेपणाची भावना निर्माण केली . स्वतः शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊनी अनेकवेळा अशा अनेकांचे सत्कार केले . संत तुकारामांची ख्याती ऐकून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सत्कार स्वीकारण्यासाठी राजदरबारी येण्याचे आवाहन केले होते . पण तुकारामांनी ते प्रांजळपणे नाकारले ह...