अनेक नेते जन्माला येतात , मोठ मोठ्या पदावर कार्य करतात , यशाची नवनवी शिखरे सुध्दा गाठतात परंतु एकदा का त्यांची खुर्ची गेली की लोकांच्या विस्मृतीत जायला त्यांना वेळ लागत नाही . मरणोपरांत तर अशा नेत्यांचे नाव लोकांच्या तोंडी राहणे तर अशक्यच , परंतु लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखी काही मोजक्या विभुती याला अपवाद असतात . म्हणूनच मुंडे साहेबांसारख्या नेत्यांना 'लोकनेता' हि पदवी लागलेली असते , नेता आणि लोकनेता या शब्दांमधला हाच काय तो एकमेव आणि महत्वाचा फरक सांगता येईल. साहेबांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी शब्द कमी पडतात , आजवर मुंडे साहेबांच्या कार्यावर भरपूर लेखन झालेलं आहे , पुढेही होत राहील परंतु त्यांचे मोठेपण शब्दांत व्यक्त करता येणार नाही . एका छोट्याश्या खेडेगावातून जन्माला आलेल्या मुंडे साहेबांनी गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्रातल्या गोरगरीब , कष्टकरी , शेतकरी, शोषित बहुजन समाजातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे . कारण मुंडे साहेबांच्या बोलण्यात आणि आचरणात काहीही फरक नसायचा ; ते जे बोलायचे तेच करायचे .साहेबांनी सत्ता आणि स्वार्थासाठी स्वतःच्या ...