Skip to main content

'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' आणि 'झिरो डार्क थर्टी'

18 सप्टेंबर 2016 रोजी जम्मू काश्मीर मधील 'उरी' सेक्टर येथे पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ला केला होता. चार दहशतवाद्यांनी एलओसी च्या जवळ असलेल्या भारतीय सैन्याच्या स्थानिक मुख्यालय मध्ये शिरून आपल्या झोपेत असलेल्या जवानांवर हल्ला केला होता. यात भारताचे जवळपास 18 जवान शहीद झाले होते. हा हल्ला करणारे चार ही दहशतवादी भारतीय सैन्याने मारले होते परंतु तेवढ्यावरच समाधान होणार नव्हते, कारण यामध्ये आपले 18 जवान आपण गमावले होते, सोबतच हा हल्ला मागच्या वीस वर्षातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता.

पाकिस्तानी दहशतवाद्यांची 'कडी निंदा' करणे,  'पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी' घालणे, संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तान विरोधात पुरावे देणे, या आणि अशा नेहमीच्या गोष्टींपेक्षा काहीतरी वेगळं करणे भाग होते आणि म्हणून 'उरी दहशतवादी हल्ल्याचा' बदला म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून "सर्जिकल स्ट्राईक" करण्याची योजना आखली होती.. पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून भारत विरोधी करवाह्या करणाऱ्या आतंकवाद्यांना यमसदनी पाठवणे आणि 'उरी' हल्ल्याचा बदला घेणे हा "सर्जिकल स्ट्राईक" चा उद्देश होता.

यावरच आधारित बहूचर्चित चित्रपट "उरी : द सर्जिकल स्ट्राईक" काल पहिला. मनोरंजनात्मक चित्रपटांपेक्षा सत्य घटनेवर आधारारीत चित्रपट मला जास्त आवडतात, तुम्हालाही आवडत असतील. आणि जर ती सत्य घटना आपल्या जवानांनी देशासाठी केलेल्या पराक्रमाची असेल तर त्याहून अधिक काही असू शकेल असं वाटत नाही..  हा चित्रपट पाहताना चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते चित्रपटाचा शेवट होईपर्यंत एक मिनिट सोडा एक सेकंद सुद्धा लक्ष विचलित होत नाही. ( The Accidental PM पाहताना माझ्या मित्राने दीड तास झोप घेतली होती..)

चित्रपटाच्या मुख्य भूमिकेतील विकी कौशल, यामिनी गौतम, परेश रावल, मोहित रैना, कीर्ती कुल्हारी या सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिकेला यथोचित न्याय दिलेला आहे. (सुरुवातीला परेश रावल यांची भूमिका अजून चांगल्या प्रकारे करता आली असती असं वाटायला लागतं, पण पुढे   त्यांनी अजित डोबाल चांगल्या प्रकारे साकारले आहेत..)

हा चित्रपट पहिल्या नंतर मला हॉलिवूड च्या "झिरो डार्क थर्टी" या चित्रपटाची आवर्जून आठवण अली .. ज्यांनी ज्यांनी तो पाहिलेला आहे त्या सर्वांना झाली असेल. 'ओसामा बिन लादेन' चा शोध करण्यापासून ते लादेन ला एबोटाबाद येथील घरात घुसून "ऑपरेशन जेरोनिमो" करून कशाप्रकारे कंठस्नान घातले ते या झिरो डार्क थर्टी चित्रपटात दखवलेलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जवळपास 90% शूटिंग भारतात झालेलं आहे..

या दोन्ही चित्रपटांची मला तुलना अजिबात करायची नाही , परंतु एवढं मात्र नक्की आहे की 'झिरो डार्क थर्टी' आणि 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' हे दोन्ही चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला एवढं मात्र नक्कीच लक्षात येते की अल कायदा चा म्होरक्या ओसामा बिन लादेन ला मारण्यासाठी अमेरिकेने राबवलेल्या 'ऑपरेशन जेरोनिमो' पेक्षा भारताने केलेले सर्जिकल स्ट्राईक कुठल्याही बाबतीत कमी नव्हते.. फरक एवढाच आहे की अमेरिकेच्या सैन्याने पाकिस्तान मध्ये राहून लादेन ला मारले.. आणि आपण पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून दहशतवाद्यांना ठोकले..

- संदीप नागरगोजे, गंगाखेड

Comments

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

*भगवानगडाचे गद्दार मंबाजी*

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य  निर्माण केलं पण त्यासाठी पोषक वातावरण हे शिवजन्मापुर्वीच्या संतांनी केलं होतं. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत सर्वांनीच कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून लोकपदेश करत समाज जागृती केली . जाती व्यवस्थेत वाटल्या गेलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे पुण्यकार्य केले . ज्याचे फळ  अठरापगड जाती धर्मातील लोकांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला स्वराज्यानिर्मीतीच्या कार्यात झोकून दिले ; प्रसंगी स्वराज्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली . शिवाजीराजाला कधी न बघितलेली लोक पण त्या राजावर जिव ओवाळून टाकण्यासाठी तत्पर असत.  कारण शिवाजी राजाच्या कार्याची महती सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य तुकारामांसारख्या संतानी केले आणि समाजात स्वराज्याविषयी  आस्था आणि आपलेपणाची भावना निर्माण केली . स्वतः शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊनी अनेकवेळा अशा अनेकांचे सत्कार केले . संत तुकारामांची ख्याती ऐकून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सत्कार स्वीकारण्यासाठी राजदरबारी येण्याचे आवाहन केले होते . पण तुकारामांनी ते प्रांजळपणे नाकारले ह...