Skip to main content

“सत्तेच्या ऊन्मादातुन आलेली कृतघ्नता आणि ऊसन्या आवेशांचे ओंगाळवाणे प्रदर्शन”



तुलना होणं अवाजवी नक्कीच नाही. गृहखात्याने भगवानगडावर सभेला परवानगी नाकारल्याने अवघ्या 3 दिवसांत संत भगवानबाबा यांची जन्मभुमी सावरगाव येथील गावकऱ्यांच्या आमंत्रणानंतर ना.पंकजाताईंचा दसरा मेळावा सहा महिन्यांपुर्वी ऊत्स्फुर्त जनसागराच्या ऊपस्थितीत पार पडला. सावरगाव कुठे आहे हे माहिती नसताना चार ते पाच लाख लोक पंकजाताईंच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून आडवळणाच्या या गावी आले.

परवा भाजपचा वर्धापनदिन बीकेसी ग्राऊंड, मुंबई येथे पार पडला. 28 विशेष रेल्वे गाड्यांची बुकींग(ऑफिशियल खर्चआहे ५कोटी!) 50,000 बसेस भाड्याने,राज्यभरातून प्रत्येक आमदार,खासदार ,मंत्र्यांना कामाला लावून  किमान 3 लाख लोक सभेला उपस्थित रहायलाच हवे असे 'टार्गेट' असताना पोलीस अंदाजानुसार त्याहुनही कमी लोक सभेला उपस्थित होते! त्यातही फुसक्या भेसुर भाषणांऐवजी ही सभा पुन्हा गाजवली दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंनीच.

38 वर्षांपुर्वी अटलबिहारी वाजपेयींनी मुंबई येथील पक्षाच्या अधिवेशनात “अंधेरा छटेगा-कमल खिलेगा” असे भाकीत केले होते. आज सत्ताकारणाच्या गोळाबेरजेमध्ये संख्यात्मक दृष्ट्या जरी “कमल खिलेगा” सत्य झालेले दिसत असले तरी गुणात्मक रित्या तसं चित्र दिसत नाही.



मुंबईच्या परवाच्या अधिवेशनाची इतिहासात “सत्तेच्या ऊन्मादातुन आलेली कृतघ्नता आणि ऊसन्या आवेशांचे ओंगाळवाणे प्रदर्शन” अशीच नोंद झाली आहे. गोपीनाथ मुंडे नावाचा सुर्य झाकुन काजव्यांनी शायनिंग मारायची हौस भागवुन घेतली ती ही पन्नास कोटींमध्ये .

Comments

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

*भगवानगडाचे गद्दार मंबाजी*

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य  निर्माण केलं पण त्यासाठी पोषक वातावरण हे शिवजन्मापुर्वीच्या संतांनी केलं होतं. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत सर्वांनीच कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून लोकपदेश करत समाज जागृती केली . जाती व्यवस्थेत वाटल्या गेलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे पुण्यकार्य केले . ज्याचे फळ  अठरापगड जाती धर्मातील लोकांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला स्वराज्यानिर्मीतीच्या कार्यात झोकून दिले ; प्रसंगी स्वराज्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली . शिवाजीराजाला कधी न बघितलेली लोक पण त्या राजावर जिव ओवाळून टाकण्यासाठी तत्पर असत.  कारण शिवाजी राजाच्या कार्याची महती सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य तुकारामांसारख्या संतानी केले आणि समाजात स्वराज्याविषयी  आस्था आणि आपलेपणाची भावना निर्माण केली . स्वतः शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊनी अनेकवेळा अशा अनेकांचे सत्कार केले . संत तुकारामांची ख्याती ऐकून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सत्कार स्वीकारण्यासाठी राजदरबारी येण्याचे आवाहन केले होते . पण तुकारामांनी ते प्रांजळपणे नाकारले ह...