तुलना होणं अवाजवी नक्कीच नाही. गृहखात्याने भगवानगडावर सभेला परवानगी नाकारल्याने अवघ्या 3 दिवसांत संत भगवानबाबा यांची जन्मभुमी सावरगाव येथील गावकऱ्यांच्या आमंत्रणानंतर ना.पंकजाताईंचा दसरा मेळावा सहा महिन्यांपुर्वी ऊत्स्फुर्त जनसागराच्या ऊपस्थितीत पार पडला. सावरगाव कुठे आहे हे माहिती नसताना चार ते पाच लाख लोक पंकजाताईंच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून आडवळणाच्या या गावी आले.
परवा भाजपचा वर्धापनदिन बीकेसी ग्राऊंड, मुंबई येथे पार पडला. 28 विशेष रेल्वे गाड्यांची बुकींग(ऑफिशियल खर्चआहे ५कोटी!) 50,000 बसेस भाड्याने,राज्यभरातून प्रत्येक आमदार,खासदार ,मंत्र्यांना कामाला लावून किमान 3 लाख लोक सभेला उपस्थित रहायलाच हवे असे 'टार्गेट' असताना पोलीस अंदाजानुसार त्याहुनही कमी लोक सभेला उपस्थित होते! त्यातही फुसक्या भेसुर भाषणांऐवजी ही सभा पुन्हा गाजवली दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंनीच.
38 वर्षांपुर्वी अटलबिहारी वाजपेयींनी मुंबई येथील पक्षाच्या अधिवेशनात “अंधेरा छटेगा-कमल खिलेगा” असे भाकीत केले होते. आज सत्ताकारणाच्या गोळाबेरजेमध्ये संख्यात्मक दृष्ट्या जरी “कमल खिलेगा” सत्य झालेले दिसत असले तरी गुणात्मक रित्या तसं चित्र दिसत नाही.
मुंबईच्या परवाच्या अधिवेशनाची इतिहासात “सत्तेच्या ऊन्मादातुन आलेली कृतघ्नता आणि ऊसन्या आवेशांचे ओंगाळवाणे प्रदर्शन” अशीच नोंद झाली आहे. गोपीनाथ मुंडे नावाचा सुर्य झाकुन काजव्यांनी शायनिंग मारायची हौस भागवुन घेतली ती ही पन्नास कोटींमध्ये .
Comments
Post a Comment