Skip to main content

गोपीनाथराव मुंडे : मरणोपरांतही कर्तुत्वाची सर्वव्यापक आभा


अनेक नेते जन्माला येतात , मोठ मोठ्या पदावर कार्य करतात , यशाची नवनवी शिखरे सुध्दा गाठतात परंतु एकदा का त्यांची खुर्ची गेली की लोकांच्या विस्मृतीत जायला त्यांना वेळ लागत नाही . मरणोपरांत तर अशा नेत्यांचे नाव लोकांच्या तोंडी राहणे तर अशक्यच , परंतु लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखी काही मोजक्या विभुती याला अपवाद असतात . म्हणूनच मुंडे साहेबांसारख्या नेत्यांना 'लोकनेता' हि पदवी लागलेली असते , नेता आणि लोकनेता या शब्दांमधला हाच काय तो एकमेव आणि महत्वाचा फरक सांगता येईल.

साहेबांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी शब्द कमी पडतात , आजवर मुंडे साहेबांच्या कार्यावर भरपूर लेखन झालेलं आहे , पुढेही होत राहील परंतु त्यांचे मोठेपण शब्दांत व्यक्त करता येणार नाही . एका छोट्याश्या खेडेगावातून जन्माला आलेल्या मुंडे साहेबांनी गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्रातल्या गोरगरीब , कष्टकरी , शेतकरी, शोषित बहुजन समाजातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे . कारण मुंडे साहेबांच्या बोलण्यात आणि आचरणात काहीही फरक नसायचा ; ते जे बोलायचे तेच करायचे .साहेबांनी  सत्ता आणि स्वार्थासाठी स्वतःच्या तत्त्वांशी कधीच तडजोड केली नाही . ती तडजोड केली असती तर मुंडे साहेब कधीच सत्तेच्या बाहेर राहीले नसते. महाराष्ट्रातील इतर तथाकथित राजकीय नेत्यांप्रमाणे लाचारी करून , किंवा कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवण्यापेक्षा मुंडे साहेबांनी संघर्ष करून सत्तापरिवर्तन करण्याचे ठरवले आणि ते शिवधनुष्य यशस्वी रित्या पेलले सुध्दा . "शिवनेरी ते शिवतीर्थ" अशी संघर्ष यात्रा काढून तात्कालिक गुन्हेगारीवर स्व.मुंडे साहेबांनी फक्त रान पेटवले , ते फक्त एवढ्यावरच शांत बसले नाहीत तर लोकांना दिलेल्या वचनाप्रमाणे सत्तेवर आल्यानंतर त्यांनी मुंबई ला अंडरवर्ल्ड पासुन मुक्त केले .  त्यावेळचे मुख्यमंत्री असलेले नारायण राणे , मनोहर जोशी यांच्यासारखे नेते आज स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहेत मात्र मुंडे साहेबांचे स्थान मात्र आज ते हयात नसताना ही हिमालायापेक्षा ही जास्त उंचीचे आहे.  महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर इतका दिलदार, आणि बेरजेचं राजकारण करणारा सर्वसमावेशक नेता क्वचितच सत्ताकारणात पाहीला असेल. कुणाच्याही दावणीला बांधुन न घेणारा, कुणाच्याही छावणीत स्वाभिमानाशी तह न केलेला, बोले तैसा चाले अशी रोखठोक भुमिका असलेला लोकनेता अशी साहेबांची ओळख महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला होती. म्हणूनच देशातील बहुजन समाजाने २००९ च्या लोकसभेनंतर त्यांना आपला नेता मानलं होतं .

मरणोपरांत ही मुंडे साहेबांच्या कर्तुत्वाची सर्वव्यापक तेजोमय आभा आज पहायला मिळते आहे . मुंडे साहेबांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले त्याचा परिपाक आज पहायला मिळत आहे . मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळ आज साहेबांच्या मुळे नावारूपास आलेले आहे . अशी कबुलीही अनेकांनी वेळोवेळी दिलेली आहे . मला मुंडेसाहेबांनी मंत्री केलं अशी कबुली नितीन गडकरींनी नुकत्याच झालेल्या बालदिनी नातवांना दिलेल्या जाहीर मुलाखतीमध्ये दिली , मला  कोणतं काम चांगलं करता येईल हे माहिती नव्हते परंतु मुंडे साहेबांनी मला मंत्री करून ती जबाबदारी दिली आणि ती मी प्रामाणिकपणे पार पाडली असल्याचे ते बोलले .

एकनाथ खडसे यांना पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागल्यानंतर "कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व "अशा मथळ्याखाली त्यांनी राज्यभर मुंडे साहेबांच्या होर्डिग्ज लावल्या होत्या , "मुंडे साहेब असते तर......" अशी वाक्य अनेकवेळा एकनाथ खडसे यांनी जाहिर सभांमध्ये अनेक विषयांवर भाष्य करताना वापरलेली आहेत , आजही वापरतात . मुंडे साहेबांच्या नावाने राष्ट्रीय रेल्वे विद्यापीठ व्हावं ही मागणी करत काॅन्ग्रेस चे राष्ट्रीय नेते राजीव सातव यांनी मुंडेसाहेबांच्या मोठेपणाने पक्षाच्या कक्षा ओलांडलेलं होतं याची परत ग्वाही दिली .

नुकतेच आपल्या खासदार पदाचा राजीनामा दिलेले भाजपचे विदर्भातील खासदार नाना पटोले यांनी "गोपीनाथ मुंडे आज असते तर माझ्यावर हि वेळ आली नसती." असे विधान करत मुंडे साहेबांच्या असण्याने काय झाले असते याविषयी विधान केले आहे . एवढंच कशाला ? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करतानाच आज मुंडे साहेब असते तर मला महाराष्ट्रात प्रचारासाठी येण्याची गरज पडली नसती अशी जाहीर कबुली दिली होती .

शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनीही मुंडे साहेब असते तर आमच्यावर वाईट वेळ आली नसती असे शेतकर्‍यांचे मत महाराष्ट्रातील जनतेने टिव्हीवर पाहीले , २०१५ च्या भिषण दुष्काळात दुष्काळग्रस्त शेतकर्‍याला ही मुंडे साहेबांची आठवण आली , शेतकर्‍यांच्या प्रश्नावर संघर्ष करताना राजु शेट्टी यांना सुध्दा मुंडे साहेबांची आठवण झाली. आज गोपीनाथ मुंडे असते तर त्यांनी शेतकऱ्यांचा त्रास समजून घेतला असता, शेतकऱ्यांना सरकारने लवकर न्याय द्यावा अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली होती. मुंडे साहेबांच्या मुळे आम्ही भाजप सोबत आलो होतो , मुंडे साहेब असते तर कदाचित आमच्यावर हि वेळ आली नसती असं वक्तव्य ही त्यांनी युती तोडताना केलेलं होतं .

गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे युती टिकून होती , ते हयात असते तर युती तुटली नसती असं उध्दव ठाकरे यांनी जाहीर सभेत बोलून दाखवलं होतं , "भाजप-शिवसेना" युती तुटल्यानंतर सर्वसामान्य नागरीकापासून ते थोर राजकीय विश्लेषकांपर्यंत सर्वांच्या तोंडी गोपीनाथराव मुंडे हे नाव होतं . भाजप पक्ष आणि भाजपाच्या नेत्यांवर सडकून टीका करणारा शिवसैनिक मुंडे साहेबांच्या बाबत कायमच आदर बाळगताना दिसतो.

१२ डिसेंबर हा मुंडे साहेबांचा जन्मदिवस , परळी स्थित 'गोपीनाथगड' या त्यांच्या समाधिस्थळावर दरवर्षी राज्यासह देशभरातून लाखो लोक त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात . "गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान" मार्फत विवीध समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साहेबांची जयंती साजरी करण्यात येत असते . यावर्षी मात्र वैद्यनाथ कारखान्यातील झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर १२ डिसेंबर चे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्व.मुंडे साहेबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे वैद्यनाथ कारखाना आणि कारखान्यातील कर्मचाऱ्यांना जपले होते . दुर्दैवाने साहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हि दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण "वैद्यनाथ कुटूंबावर" पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे . या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी असलेले सर्व लोक सुखरूप घरी परतावे या प्रार्थनेसह, लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींस विनम्र अभिवादन..

लेखक :  संदीप नागरगोजे , (गंगाखेड)

Comments

  1. समर्पक वर्णन! विनम्र अभिवादन __/\__

    ReplyDelete
  2. *पोलादी मनगट,निधडी छाती,वंचित,कष्टकर्‍यांचा आवाज*!!! प्रचंड संघर्षातुन तयार झालेलं एक असामान्य नेतृत्व *स्व.गोपीनाथरावजी मुंडे* यांच्या जयंतीनिमित्त ।। विनम्र अभिवादन ।।💐💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

*भगवानगडाचे गद्दार मंबाजी*

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य  निर्माण केलं पण त्यासाठी पोषक वातावरण हे शिवजन्मापुर्वीच्या संतांनी केलं होतं. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत सर्वांनीच कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून लोकपदेश करत समाज जागृती केली . जाती व्यवस्थेत वाटल्या गेलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे पुण्यकार्य केले . ज्याचे फळ  अठरापगड जाती धर्मातील लोकांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला स्वराज्यानिर्मीतीच्या कार्यात झोकून दिले ; प्रसंगी स्वराज्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली . शिवाजीराजाला कधी न बघितलेली लोक पण त्या राजावर जिव ओवाळून टाकण्यासाठी तत्पर असत.  कारण शिवाजी राजाच्या कार्याची महती सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य तुकारामांसारख्या संतानी केले आणि समाजात स्वराज्याविषयी  आस्था आणि आपलेपणाची भावना निर्माण केली . स्वतः शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊनी अनेकवेळा अशा अनेकांचे सत्कार केले . संत तुकारामांची ख्याती ऐकून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सत्कार स्वीकारण्यासाठी राजदरबारी येण्याचे आवाहन केले होते . पण तुकारामांनी ते प्रांजळपणे नाकारले ह...