Skip to main content

स्वाभिमानी संघर्षाचा वारसा नव्हे 'वसा', महाराष्ट्राच्या भाग्यरेषेवर पंकजाताईंचा ठसा..

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजेंच्या मृत्युनंतर स्वराज्याचे रक्षण करत औरंगजेबाच्या सैन्यासोबतच स्वकीय विरोधकांना ही सळो की पळो करून सोडणारी महाराणी ताराराणी , होळकरशाही सक्षमपणे संभाळत नेत्रदीपक कामगिरी करणारी अहिल्या, "मै मेरी झांसी नहीं दुंगी"चा यल्गार करत शत्रूवर तुटून पडणारी झाशीची राणी, बापाच्या मृत्यूनंतर राजकारणात सक्रिय झालेल्या वारसदार मुलीला गुंगी गुडीया म्हणून हिणवणा-या हिनकस प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवत "आयर्न लेडी" बनलेली इंदिरा गांधी  यांच्या प्रमाणेच राजकीय आणि सामाजिक जिवनात लाखो निस्वार्थी मावळ्यांना घेऊन कटकारस्थानी आप्तस्वकीय आणि दर्जाहीन विरोधकांना एकाकी झुंज देत पुरून उरणारी रणरागिणी पंकजाताई यांचा आज (26 जुलै) वाढदिवस आहे.

महाराष्ट्रात अनेक राजकिय नेत्यांचे वारसदार राजकारणात आहेत परंतु बापाची पुण्याई वगळता त्यांच्याकडे स्वतःचं विशेष असं काहीही नाही. मात्र पंकजाताई गोपीनाथराव मुंडे या याबाबतीत अपवाद आहेत. खुप कमी कालावधीत पंकजाताई  "लोकनेता" झाल्या आहेत.

लोकनेते मुंडे साहेबांसारख्या लोकप्रिय लोकनेत्याचा वारसा जेवढा मोठा तेवढाच तो काटेरी सुध्दा होता. तत्त्वांशी तडजोड न करता नेहमी सत्यासाठी लढणाऱ्या मुंडे साहेबांना जनतेने भरभरून प्रेम दिले , या कारणामुळे त्यांच्यावर जळणारे अनेक विरोधक सुध्दा तयार झाले. पंकजाताईंना साहेबांच्या वारशामध्ये मध्ये लोकांचे ते प्रेम भरभरून मिळाले त्याचबरोबरच साहेबांचे विरोधक सुध्दा मिळाले. साहेबांच्या पश्चात त्यांची मुलगी हे सर्व सांभाळू शकते का ? असा अनेक राजकिय विश्लेषकांना प्रश्न पडत होता. परंतु आज फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात कर्तबगार मंत्री म्हणून त्यांनी स्वतःला सिध्द केले आहे.

पंकजाताईंच्या कल्पकतेतून साकारलेले जलयुक्त शिवार हे महाराष्ट्र शासनाचे अभियान  देशभरात दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरले आहे . जलयुक्त शिवार अभियान हि फक्त एक योजना न राहता त्याला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे तोंडभरून कौतुक करत देशभरात जलयुक्त शिवार चे अनुकरण करण्याच्या सुचना केल्या होत्या. राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा राज्यातील संबंधित मंत्री आणि आधिकार्यांनी या संदर्भात पंकजाताईंची भेट घेत मार्गदर्शन सुध्दा घेऊन त्यांच्या राज्यात जलयुक्त शिवार च्या धर्तीवर अभियान राबवले आहे.

राज्यात कोणत्याही जिल्ह्याच्या तुलनेत बीड जिल्ह्याचा विकास प्रचंड जलदगतीने होत आहे . लोकनेते मुंडे साहेबांच्या स्वप्नपूर्ती चा वसा घेतलेल्या दोन्ही "मुंडे भगिनींनी" अथक परिश्रम घेत बीड जिल्ह्यात रेल्वे आणण्याचे साहेबांचे स्वप्न पुर्ण केले आहे. शिवाय जिल्ह्यात अनेक महामार्ग आणले आहेत , विवीध विकासकामे गतीमान पध्दतीने पूर्णत्वाला जात आहेत.

मराठवाड्याच्या विकासाचा बॅकलाॅग भरुन काढण्यासाठी पंकजाताईंची आग्रही भुमिका राहीली आहे . मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत राज्यात  ३५,००० किलोमीटर रस्त्यांचे जाळे उभारण्याचा त्यांचा संकल्प असून टाकाऊ प्लॅस्टीक चा रस्त्यांसाठी ऊपयोग करण्याची अभिनव संकल्पना राबविली जात आहे.

जलयुक्त शिवार अभियानाबरोबरच पंकजाताईंच्या नेतृत्वात पंचायत राज विकेंद्रीकरणात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर आलाय तर इंदिरा आवास योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेबद्दल सुध्दा मोदींच्या केंद्र सरकाराकडून कौतुक होत आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ग्रामीण महाराष्ट्राच्या दळणवळणाचा नवा अध्याय रचला जातोय . रस्तानिर्मीतीसाठी प्लास्टीकचा वापर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे.

खरं तर पंकजाताई आणि प्रितमताई या दोन्ही बहिणी राजकारणापासून दूर होत्या त्यांचा दुरवर राजकारणाशी काहीही संबंध नव्हता . प्रितमताईंना साहेबांच्या नंतर अचानक पणे राजकारणात यावे लागले तर पंकजाताईंना साहेबांच्या "जवळचे" लोक गद्दार झाल्याने नाईलाजाने राजकारणात यावं लागलं होतं.आजही ताईंना बदनाम करण्याची सुपारी घेतलेले लोक बिनबुडाचे आरोप करण्यात धन्यता मानतात पण ताई सत्याच्या जोरावर सर्वांशी समर्थपणे लढत आहेत.

लोकनेते मुंडे साहेबांचे स्वप्न पुर्ण करण्याची शपथ घेऊन लोककल्याणासाठी रात्रंदिवस समर्थपणे लढणाऱ्या खंबीर ताईसाहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!!!

● संदीप नागरगोजे, गंगाखेड ●

Comments

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

नामांतर चळवळ आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे

२१ एप्रिल १९९४ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत एका ऐतिहासिक विधेयकावर चर्चा सुरू होती . हे विधेयक यासाठी ऐतिहासिक होते की  फक्त मराठवाड्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील शोषित बहुजन समाजाची एक भावना होती की औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले जावे . संपूर्ण सभागृहात सर्वत्र शांतता होती , नामातंर चळवळीस मराठवाडय़ात उग्र रूप प्राप्त झाले होते .मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे का गरजेचं आहे या विषयी सभागृहात एक आवाज घुमत होता. सर्व सदस्य शांतपणे महाराष्ट्राच्या या तरुण जिगरबाज योध्द्याचे भाषण ऐकत होते. तो आवाज होता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा . आपल्या भाषणात ते म्हणतात "भारतीय राज्यघटनेने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य सामान्य, शोषित, दलित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. समाजातील भेदभाव , अस्पृश्यता या विरोधात आवाज उठवाला . समाजातील आर्थिक विषमता दुर करण्यासाठी प्रयत्न केले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर या शोषित समा...