Skip to main content

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने..

आज गुरुपौर्णिमा...  गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या शेकडो पोस्टांनी फेसबुक भरून गेलेले आहे . माझ्याही आयुष्यात मला घडवणारे अनेक गुरूजन लाभले , आई - वडिल - मोठा भाऊ यांच्या शिवाय गावात प्राथमिक शाळेत श्री तेलंग सरांचा माझ्यावर विशेष प्रभाव , शाळेत बसत नाही म्हणून शिक्षा करणाऱ्या तेलंग सरांना चिमटे घेऊन पळून जाणारा मी भितीने परत शाळेत जायचे नाव घेत नव्हतो तेंव्हा घरी येऊन दोन रुपये हातावर ठेऊन शाळेत घेऊन जाणारे तेलंग सर आजही आठवतात आणि आजही माझ्या कोणत्याही कामात मी त्यांचा सल्ला घेतो , दुसरे जोशी सर.. जोशी सरांची शिकवण्याची पध्दत अतिशय सुरेख,  तेलंग सरांची बदली झाल्यानंतर आमच्या गावच्या शाळेची झालेली अवकळा त्यांनीच सुधारली..पुढे पाचवी झाल्या नंतर गावात पुढची इयत्ता नसल्याने इयत्ता सहावी साठी गावापासून तीन - साडेतीन किमी अंतरावर असलेल्या मरगळवाडी च्या शाळेत प्रवेश घेतला.. तिथले कदम सर आणि वाडीवाले सर हे माझे आवडते.. आठवी पासून बारावी पर्यंत विशेष नाव घ्यावं असं कोणी वाटलंच नाही.. तरी गंगाखेड च्या संत जनाबाई शाळेतील नागरगोजे सर आणि मुंडे सर विसरता येणार नाहीत.

नंदुरबार जिल्ह्य़ातील महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या नवापूर येथील मार्च अध्यापक विद्यालयात डि.एड साठी नंबर लागला होता तिथून डायरेक्ट गंगाखेड ला Mitual Transfer मिळाल्याने तिथे जास्त दिवस राहता आले नाही परंतु तिथे गावीत सरांनी केलेले सहकार्य नेहमीच स्मरणात आहे .

नवापूर वरून बदली करून पुढे डि.एड साठी गंगाखेड ला आलो आणि इथे असे काही महाभाग प्राध्यापक भेटले की मी पुरता गोंधळून गेलो होतो . उठसूट कोणत्याही गोष्टीचा काहीही संबंध नसताना काहीच्या काही निष्कर्ष काढणारे आणि विद्यार्थ्याच्या विरोधात (माझ्या विरोधात) उगाचच काहीही उचापती करणारे शिक्षक मी पहिल्यांदाच पाहत होतो माझ्या विरोधात सुरू असलेले उद्योग ढळढळीत समोर दिसत असताना मी मात्र "गुरू परमात्मा" मानणारा असल्याने सर्व काही सहन करत होतो . पुढे एका अध्यात्मिक महाराजांच्या भेटीत या विषयावर चर्चा झाल्यानंतर अशांना गुरू मानूच नये हे शब्द ऐकल्यावर माझ्यात झालेला बदल सुरूवातीला कोणाच्याही पचनी पडत नव्हता . ( इथल्या शिक्षकांच्या "त्या" कुरापती कोणत्या आणि कशासाठी होत्या हे इथे सांगने उचित होणार नाही..) पुढे दोनवर्ष हा संदीप नागरगोजे त्यांच्या स्वप्नात सुद्धा त्रास देत होता हे सेंड ऑफ च्या कार्यक्रमात त्यांनीच कबुल केलेले वास्तव आहे . अर्थातच तिथे ही काही अपवाद असलेले कांबळे सरांसारखे चांगले आणि प्रामाणिक शिक्षक होतेच.. "शिक्षक/गुरू कसा नसावा" हे इथे समजले.

डिएडला असताना इंग्रजी विषयाचे क्लास करावेत म्हणून आमचे लहानपणापासून घरगुती संबंध असलेल्या बाळु भाऊ ( मुंढे सर ) कडे लावले होते तिथं आपला बाळु भाऊ शिक्षक म्हणून कसा आदर्श व्यक्तीमत्व आहे हे समजले .  पुढे काही दिवस स्पर्धा परीक्षांचे क्लासेस करण्यासाठी लातूर च्या सोहम आणि फिनिक्स क्लासेस ला होतो तिथे भेटलेले डाॅ.बाबुराव बिक्कड सर हे मला आजही खुपच आदर्श वाटतात , ते सध्या परळी वैजनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आहेत.

थोडक्यात हे शैक्षणिक क्षेत्रातील  गुरूंचे सिंहावलोकन म्हणता येईल . पण या क्षेत्रा व्यतिरिक्त बाकी क्षेत्रातील अनेक लोक भेटले ज्यांना माझ्या मनाने मनोमन गुरुस्थानी मानले आहे. त्यापैकी काही मोजकी नावे घ्यायलाच हवीत.

माझ्या फेसबुकच्या मित्र यादीत  विवीध क्षेत्रातील नामांकित मंडळी आहेत त्यापैकी डाॅक्टर नितीन चाटे सर यांच्या विषयी प्रचंड आदर आहे . अंबाजोगाई च्या वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्जरी विभागाचे प्रमुख प्रसिद्ध सर्जन डाॅ.नितीन चाटे यांचा त्यांनी राबवलेल्या विक्रमी आरोग्य शिबिराच्या कार्याबद्दल  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभु आणि ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी नुकताच त्यांचा सत्कार केला आहे.

मला राजकारणातले काहीही कळत नाही तरी या क्षेत्रातील अनेक लोकांशी चांगले संबंध आहेत त्या सर्वांची नावे इथे लिहीता येणार नाहीत . राजकिय क्षेत्रातील गंगाखेड तालुक्यातील मातब्बर नाव असलेले भगवान भाऊ सानप हे नेहमीच मला लहाण भावा प्रमाणे मार्गदर्शन करतात . पत्रकारिता क्षेत्राची विलक्षण आवड आहे , या पैकी दैनिक एकमत चे संपादक सुशील कुलकर्णी यांचे लेख आवर्जून वाचतो , एबीपी माझा चे विलास बडे यांची बातम्या सांगण्याची पध्दत आणि लिखान दोन्ही परफेक्ट असतं.. बाकी फेसबुक आणि आध्यात्मिक क्षेत्रात असे भरपूर लोक आहेत ज्यांना गुरू मानता येईल .अनेक मित्रही असे आहेत जे या यादीत बसतील. त्यामुळे सर्वांचे नाव घेणे शक्य नाही त्याबद्दल क्षमस्व.. हे लिहीताना आठवून - साठवून लिहीत नसल्याने अनेकांचा उल्लेख यात झाला नसेल..

अशा ज्ञात अज्ञात सर्व गुरूजनांना   गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..

: संदीप नागरगोजे, गंगाखेड

Comments

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

नामांतर चळवळ आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे

२१ एप्रिल १९९४ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत एका ऐतिहासिक विधेयकावर चर्चा सुरू होती . हे विधेयक यासाठी ऐतिहासिक होते की  फक्त मराठवाड्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील शोषित बहुजन समाजाची एक भावना होती की औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले जावे . संपूर्ण सभागृहात सर्वत्र शांतता होती , नामातंर चळवळीस मराठवाडय़ात उग्र रूप प्राप्त झाले होते .मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे का गरजेचं आहे या विषयी सभागृहात एक आवाज घुमत होता. सर्व सदस्य शांतपणे महाराष्ट्राच्या या तरुण जिगरबाज योध्द्याचे भाषण ऐकत होते. तो आवाज होता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा . आपल्या भाषणात ते म्हणतात "भारतीय राज्यघटनेने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य सामान्य, शोषित, दलित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. समाजातील भेदभाव , अस्पृश्यता या विरोधात आवाज उठवाला . समाजातील आर्थिक विषमता दुर करण्यासाठी प्रयत्न केले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर या शोषित समा...