Skip to main content

भारताच्या राजकारणातील ध्रुवतारा ; लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब


०३ जुन २०१८ : लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांची चौथी पुण्यतीथी, साहेबांना जाऊन बघता बघता चार वर्षे झाली मात्र आज मागच्या तीन वर्षांप्रमाणेच ०३ जुन जवळ येताच मन परत २०१४ च्या त्या काळ्या दिवसांमध्ये प्रवेश करत आहे. साहेब आज आपल्यात नाहीत हे मानायला अजूनही मन धजावत नाही. चार वर्षे झाली तरीही साहेबांच्या अवेळी जाण्याने जो आघात झाला होता ती जखम अजूनही भरून येत नाही.. माझ्यासारखीच लाखो लोकांची अवस्था हिच आहे. काही लोकांना हे अतिशयोक्तीही वाटेल कि एखाद्या राजकीय नेत्यावर एवढं प्रेम कसं काय असु शकतं ? असा प्रश्न सुध्दा अनेकांना पडत असणार.. परंतू स्व.मुंडे साहेबांच्या बाबत हेच वास्तव आहे. जन्मभर लोकांच्या हृदयात आणि मरणोपरांत लोकांच्या हृदयाबरोबर देवघरात मुंडे साहेब पोहोचले आहेत , गावात सप्ताहाच्या पत्रिका असतील अथवा लग्न समारंभाच्या पत्रिका असतील लोक अशा प्रत्येक शुभ कार्याच्या प्रसंगी अठरा पगड जाती धर्मातील लोक साहेबांचा फोटो वापरत आहेत. या देशात लोकांचे एवढं प्रेम आणि आदर मिळवणारे हजारो नेते झाले असतील , यापुढेही होत राहतील परंतु ध्रुवताऱ्या प्रमाणे  जे अढळस्थान लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांना मिळालं आहे हे कदाचीत इतर कोणत्याही नेत्याला मिळवने कधीच शक्य होणार नाही..

माझ्याबाबत सांगायचं झालं तर  राजकारणातला "र" सुध्दा माहीती नव्हता तेंव्हापासून मुंडे साहेब हे नाव जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेलं आहे. लहाणपणापासून ज्या गोपीनाथ मुंडे नावाला ऐकत , बघत आणि वाचत आलो त्या मुंडे साहेबांना मी प्रत्यक्षात बघण्याचा योग साहेबांच्या "गोदापरिक्रमा" या यात्रेदरम्यान आला होता. गंगाखेड तालुक्यातील महातपुरी या गोदावरी च्या काठावर वसलेल्या गावात साहेब येणार होते. आणि म्हणून मी माझा मोठा भाऊ केशव नागरगोजे यांच्या सोबत हट्ट करून गेलो होतो, भाषणात काय बोलत आहेत ते समजत नव्हतंच परंतु मला आजही साहेबांनी भर पावसात ट्रक वर उभा राहून पावसात  भिजत केलेलं भाषण आठवतंय. हजारो लोक पावसात भिजत माझं भाषण ऐकत असताना मी छत्रीखाली उभा राहून बोलूच शकत नाही असं साहेब त्यावेळी बोलले होते.. मुंडे साहेबांची ती प्रतिमा माझ्या डोळ्यांच्या पटलावर कायमची जतन झालेली आहे.

अनेक नेते जन्माला येतात , मोठ मोठ्या पदावर कार्य करतात , यशाची नवनवी शिखरे सुध्दा गाठतात परंतु एकदा का त्यांची खुर्ची गेली की लोकांच्या विस्मृतीत जायला त्यांना वेळ लागत नाही . मरणोपरांत तर अशा नेत्यांचे नाव लोकांच्या तोंडी राहणे तर अशक्यच , परंतु लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखी काही मोजक्या विभुती याला अपवाद असतात . म्हणूनच मुंडे साहेबांसारख्या नेत्यांना 'लोकनेता' हि पदवी लागलेली असते , नेता आणि लोकनेता या शब्दांमधला हाच काय तो एकमेव आणि महत्वाचा फरक सांगता येईल.

साहेबांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी शब्द कमी पडतात , आजवर मुंडे साहेबांच्या कार्यावर भरपूर लेखन झालेलं आहे , पुढेही होत राहील परंतु त्यांचे मोठेपण शब्दांत व्यक्त करता येणार नाही . एका छोट्याश्या खेडेगावातून जन्माला आलेल्या मुंडे साहेबांनी गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्रातल्या गोरगरीब , कष्टकरी , शेतकरी, शोषित बहुजन समाजातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे . कारण मुंडे साहेबांच्या बोलण्यात आणि आचरणात काहीही फरक नसायचा ; ते जे बोलायचे तेच करायचे .साहेबांनी  सत्ता आणि स्वार्थासाठी स्वतःच्या तत्त्वांशी कधीच तडजोड केली नाही . ती तडजोड केली असती तर मुंडे साहेब कधीच सत्तेच्या बाहेर राहीले नसते. महाराष्ट्रातील इतर तथाकथित राजकीय नेत्यांप्रमाणे लाचारी करून , किंवा कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवण्यापेक्षा मुंडे साहेबांनी संघर्ष करून सत्तापरिवर्तन करण्याचे ठरवले आणि ते शिवधनुष्य यशस्वी रित्या पेलले सुध्दा . "शिवनेरी ते शिवतीर्थ" अशी संघर्ष यात्रा काढून तात्कालिक गुन्हेगारीवर स्व.मुंडे साहेबांनी फक्त रान पेटवले , ते फक्त एवढ्यावरच शांत बसले नाहीत तर लोकांना दिलेल्या वचनाप्रमाणे सत्तेवर आल्यानंतर त्यांनी मुंबई ला अंडरवर्ल्ड पासुन मुक्त केले .  त्यावेळचे मुख्यमंत्री असलेले नारायण राणे , मनोहर जोशी यांच्यासारखे नेते आज स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहेत मात्र मुंडे साहेबांचे स्थान मात्र आज ते हयात नसताना ही हिमालायापेक्षा ही जास्त उंचीचे आहे.  महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर इतका दिलदार, आणि बेरजेचं राजकारण करणारा सर्वसमावेशक नेता क्वचितच सत्ताकारणात पाहीला असेल. कुणाच्याही दावणीला बांधुन न घेणारा, कुणाच्याही छावणीत स्वाभिमानाशी तह न केलेला, बोले तैसा चाले अशी रोखठोक भुमिका असलेला लोकनेता अशी साहेबांची ओळख महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला होती. म्हणूनच देशातील बहुजन समाजाने २००९ च्या लोकसभेनंतर त्यांना आपला नेता मानलं होतं.

अनेक मोठं मोठ्या राजकीय नेत्यांचे वारसदार आज राजकारणात आहेत. परंतू मुंडे साहेबांच्या लेकीं प्रमाणे आपला वेगळा असा ठसा कोणाला उमटवता आलेला नाही. पंकजाताई असतील अथवा प्रितमताई असतील दोन्ही भगिनींनी आपल्या कामातून त्या मुंडे साहेबांचा वारसा कशा सक्षमपणे चालवत आहेत हे वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे.. कुठल्याही मुलीने बनवले नसेल असे मुंडे साहेबांचे #गोपीनाथगड हे स्मारक ताईंनी बनवले आहे. एखाद्या तीर्थस्थानाप्रमाणे लोकांच्या मनात गोपीनाथगड विषयी भावना आणि श्रध्दा निर्माण झाली आहे. १२ डिसेंबर  (जयंती) आणि ०३ जुन (पुण्यतीथी) निमित्ताने गोपीनाथगडावर राज्यभरातून लाखोंच्या संख्येत लोक येतात.. आणि दरवर्षी हि संख्या वाढत जात आहे.. लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांप्रमाणेच "गोपीनाथगड" लोकांना आधार आणि नवी उर्जा देण्याचं कार्य करत आहे.. करत राहील...

संदीप नागरगोजे, गंगाखेड

Comments

  1. तुम्ही जिवंत आहात...आमच्या ...आणि आमच्या सारख्या लाखो -करोडो अनुयायांच्या हृदयात ...! असा लोकनेता होणे नाही कारण तुम्ही अनाथांचे नाथ होतात....
    #साहेब...... विनम्र अभिवादन....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

*भगवानगडाचे गद्दार मंबाजी*

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य  निर्माण केलं पण त्यासाठी पोषक वातावरण हे शिवजन्मापुर्वीच्या संतांनी केलं होतं. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत सर्वांनीच कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून लोकपदेश करत समाज जागृती केली . जाती व्यवस्थेत वाटल्या गेलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे पुण्यकार्य केले . ज्याचे फळ  अठरापगड जाती धर्मातील लोकांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला स्वराज्यानिर्मीतीच्या कार्यात झोकून दिले ; प्रसंगी स्वराज्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली . शिवाजीराजाला कधी न बघितलेली लोक पण त्या राजावर जिव ओवाळून टाकण्यासाठी तत्पर असत.  कारण शिवाजी राजाच्या कार्याची महती सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य तुकारामांसारख्या संतानी केले आणि समाजात स्वराज्याविषयी  आस्था आणि आपलेपणाची भावना निर्माण केली . स्वतः शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊनी अनेकवेळा अशा अनेकांचे सत्कार केले . संत तुकारामांची ख्याती ऐकून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सत्कार स्वीकारण्यासाठी राजदरबारी येण्याचे आवाहन केले होते . पण तुकारामांनी ते प्रांजळपणे नाकारले ह...