गोपीनाथ मुंडे ; महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात स्वयंकर्तुत्वाने आणि स्वाभिमानाने स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारा लोकनेता. तसं पाहता महाराष्ट्रात इतरांच्या पाठीत खंजीर खुपसून आणि स्वाभिमान गहाण ठेवून मोठे झालेले उदाहरणे आहेतच परंतु तत्त्वांशी एकनिष्ठ राहून परिस्थितीशी संघर्ष करत सत्याच्या मार्गावर चालणारा आणि महाराष्ट्रातल्या मोठ्यात मोठ्या आणि लहाणात लहाण व्यक्तीला आपलासा वाटणारा एकमेव लोकनेता म्हणजे स्व.मुंडे साहेब..
जीवनातील जास्तीत जास्त कालावधी संघर्षांत आणि विरोधीपक्षात काढलेले मुंडे साहेब आणि दोनच वर्षांमध्ये सत्तेवाचून तडफडणारे आजचे काही नेते बघता मुंडे साहेबांचे मोठेपण क्षितीजामध्ये प्रकाशाने ठळकपणे चमकणाऱ्या सूर्यनारायणाप्रमाणे दिसून येते.
साहेबांच्या पश्चात सुध्दा महाराष्ट्राचे राजकारण त्यांच्या नावाभोवती फिरताना आपण पाहत आहोतच. राजकारणाला राजकारणापुरते मर्यादित न ठेवता व्यक्तिगत पातळीवर आणलेले त्यांचे विरोधक विशेषतः पवार घराणे आज ही त्यांच्या पश्चात त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत आपल्या गलिच्छ राजकारणाचा आणि संस्कारांचा परिचय देतात. ०७ फेब्रुवारी २०१७ रोजी अशाच एका तथ्यहिन आणि मूर्खपणाच्या विधानावर महाराष्ट्रात तीव्र क्रिया प्रतिक्रिया उमटल्या होत्या. "मुंडे साहेबांनी शरद पवारांचे वलय पाहून आपली जन्मतारीख १२ डिसेंबर केली होती" असा जावईशोध अजित पवार यांनी लावला होता . तत्पूर्वी २०१० साली मुंडे साहेबांच्या एकसष्टी च्या कार्यक्रमात स्वतःहून मुंडे साहेबांनी त्यांची खरी जन्मतारीख माहीती नसल्याचे सांगितले होते. शाळेत प्रवेश करताना शिक्षकाने १२ डिसेंबर हि जन्मतारीख टाकली आणि तीच पुढे साहेबांची अधिकृत जन्मतारीख गणल्या गेली.. ( अर्थात ज्यावेळी मुंडे साहेबांनी शाळेत प्रवेश घेतला होता त्यावेळी सन्मानिय अजित पवार हे अस्तीत्वात सुध्दा नव्हते ).
१९९५ साली मुंडे साहेबांनी काढलेल्या "संघर्षयात्रा" ने महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले. तत्कालिन सरकारच्या कारणाम्यांचा संघर्षयात्रेतून साहेबांनी पर्दाफाश केला होता . त्यावेळी शरद पवारांना सत्तेतून हद्दपार केल्यानंतर पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या शरद पवारांसारख्या नेत्याला कधीच स्वतःच्या हिमतीवर सत्तेत येता आले नाही हे राष्ट्रवादी पक्षाचे आणि पवार घराण्याचे मुंडे साहेबांप्रती खरे दुखणे असावे. करीता मुंडे साहेबांच्या लहाणात लहाण विरोधकाला सुध्दा सत्तेचा गैरवापर करून क्षमता न बघता फक्त "मुंडेविरोध" हा गुणधर्म केंद्रस्थानी ठेवून पवार घराण्याने भरभरून दिले. ( आजही देत आहेत ), जातीयवादी प्रचार केला गेला. महाराष्ट्राच्या निवडणुका "बीड जिल्हा केंद्री" केल्या .. बीड मध्ये अर्धी ताकद लावणे आणि उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात हे सूत्र वापरल्या गेले . अशा कठीण परिस्थितीत सुध्दा मुंडे साहेब कधीच डगमगले नाहीत , पराभूत झाले नाहीत .
२०१४ च्या लोकसभेला मात्र परिस्थिती मुंडे साहेबांच्या बाजूने होती . " मुंडे साहेबांच्या विरोधात उभा रहा म्हणले तर राष्ट्रवादी च्या नेत्यांच्या चड्या पिवळ्या होत होत्या " ( हे वाक्य २०१४ ला साहेबांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या सुरेश धस यांचे आहे ) . मुंडे साहेबांच्या दहशतीने संभावित पराभव समोर दिसत असल्याने स्वतः शरद पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेत राज्यसभा गाठली आणि मुलीच्या जागेसाठी अंधारात मोदींची शरणांगती पत्करली होती. महादेव जानकरांच्या उमेदवारीला पंकजाताई यांच्या झंझावाती प्रचाराची जोड मिळाली. बारामतीत पवार कन्येचा विजय झाला खरा पण साडे तीन लाखांचे मताधिक्य सत्तर हजारांवर आले. लोकसभा निवडणुक संपली देशात आणि महाराष्ट्रात सत्तांतर झाले परंतु दुर्दैवाने साहेब आपल्यातून गेले .
मृत्युनंतर वैर संपते म्हणतात परंतु साहेबांच्या जिवंतपणी जे आपल्याला जमले नाही ते त्यांच्या माघारी करू असा असुरी विचार करणारे आजही त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करतात परंतु साहेबांच्या केलेल्या सत्कार्यांच्या जोरावर परत परत तोंडावर आपटतात. मुंडेसाहेबांच्या पुतण्यावर पवारांची अनाठायी भिस्त असनं आणि त्यापायी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे तीन चार तुकडे पडणं हा पवारांना फटके देणारा काळाचा आसुड आहे.
आज मुंडे साहेबांच्या विरोधात अख्खी हयात घालवलेले विरोधक त्यांचे अनुकरण करत आहेत.. स्वतः वायफळ आरोप करणार्या अजित पवार यांनी मुंडे साहेबांचे तेच "वलय" पाहून "संघर्षयात्रा" काढली आहे.
साहेबांच्या संघर्ष यात्रेची आठवण ताजी करणारी तितकाच जनतेचा पाठिंबा मिळालेली संघर्ष यात्रा पंकजाताईंची ठरली होती .सत्तर विधानसभा मतदारसंघांवर पंकजाताईंच्या संघर्ष यात्रेनं विजय मिळवून दिला. एकट्या पंकजाताईंनी काढलेल्या संघर्षयात्रेची आणि आताच्या समस्त विरोधकांनी मिळून काढलेल्या संघर्षयात्रेची तुलना करता पंकजाताईंच्या संघर्षयात्रा च्या 10% हि लोकांचा पाठींबा या यात्रेस मिळताना दिसत नाही.
लोकांप्रती कळवळा आणि प्रेम र्हदयात आणि रक्तात नसल्याने हा संघर्ष सरळ सरळ विरोधकांना झालेला 'संसर्ग' भासतोय. जनकल्याणाची तळमळ असेल तर कोणत्याही यात्रा यशस्वी होत असतात. नाहीतर अशा कितीही "संघर्षयात्रा" काढल्या तरी त्या यात्रांचा असाच फज्जा होणार आणि त्या संघर्षयात्रा ऐवजी #संसर्गयात्रा भासणार यात शंकाच नाही..
~■ संदीप नागरगोजे , गंगाखेड ■~
Comments
Post a Comment