Skip to main content

संघर्षयात्रा विरुद्ध संसर्गयात्रा .

गोपीनाथ मुंडे ; महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात स्वयंकर्तुत्वाने आणि स्वाभिमानाने स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारा लोकनेता. तसं पाहता महाराष्ट्रात इतरांच्या पाठीत खंजीर खुपसून आणि स्वाभिमान गहाण ठेवून मोठे झालेले उदाहरणे आहेतच परंतु तत्त्वांशी एकनिष्ठ राहून परिस्थितीशी संघर्ष करत सत्याच्या मार्गावर चालणारा आणि महाराष्ट्रातल्या मोठ्यात मोठ्या आणि लहाणात लहाण व्यक्तीला आपलासा वाटणारा एकमेव लोकनेता म्हणजे स्व.मुंडे साहेब..

जीवनातील जास्तीत जास्त कालावधी संघर्षांत आणि विरोधीपक्षात  काढलेले मुंडे साहेब आणि दोनच वर्षांमध्ये सत्तेवाचून तडफडणारे आजचे काही नेते बघता मुंडे साहेबांचे मोठेपण क्षितीजामध्ये प्रकाशाने ठळकपणे चमकणाऱ्या सूर्यनारायणाप्रमाणे दिसून येते.

साहेबांच्या पश्चात सुध्दा महाराष्ट्राचे राजकारण त्यांच्या नावाभोवती फिरताना आपण पाहत आहोतच. राजकारणाला राजकारणापुरते मर्यादित न ठेवता व्यक्तिगत पातळीवर आणलेले त्यांचे विरोधक विशेषतः पवार घराणे आज ही त्यांच्या पश्चात त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत आपल्या गलिच्छ राजकारणाचा आणि संस्कारांचा परिचय देतात. ०७ फेब्रुवारी २०१७ रोजी अशाच एका तथ्यहिन आणि मूर्खपणाच्या विधानावर महाराष्ट्रात तीव्र क्रिया प्रतिक्रिया उमटल्या होत्या. "मुंडे साहेबांनी शरद पवारांचे वलय पाहून आपली जन्मतारीख १२ डिसेंबर केली होती" असा जावईशोध अजित पवार यांनी लावला होता . तत्पूर्वी २०१० साली मुंडे साहेबांच्या एकसष्टी च्या कार्यक्रमात स्वतःहून मुंडे साहेबांनी त्यांची खरी जन्मतारीख माहीती नसल्याचे सांगितले होते. शाळेत प्रवेश करताना शिक्षकाने १२ डिसेंबर हि जन्मतारीख टाकली आणि तीच पुढे साहेबांची अधिकृत जन्मतारीख गणल्या गेली.. ( अर्थात ज्यावेळी मुंडे साहेबांनी शाळेत प्रवेश घेतला होता त्यावेळी सन्मानिय अजित पवार हे अस्तीत्वात सुध्दा नव्हते ).

१९९५ साली मुंडे साहेबांनी काढलेल्या "संघर्षयात्रा" ने महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले. तत्कालिन सरकारच्या कारणाम्यांचा संघर्षयात्रेतून साहेबांनी पर्दाफाश केला होता . त्यावेळी शरद पवारांना सत्तेतून हद्दपार केल्यानंतर पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या शरद पवारांसारख्या नेत्याला कधीच स्वतःच्या हिमतीवर सत्तेत येता आले नाही हे राष्ट्रवादी पक्षाचे आणि पवार घराण्याचे मुंडे साहेबांप्रती खरे दुखणे असावे. करीता मुंडे साहेबांच्या लहाणात लहाण विरोधकाला सुध्दा सत्तेचा गैरवापर करून  क्षमता न बघता फक्त "मुंडेविरोध" हा गुणधर्म केंद्रस्थानी ठेवून  पवार घराण्याने भरभरून दिले. ( आजही देत आहेत ), जातीयवादी प्रचार केला गेला. महाराष्ट्राच्या निवडणुका "बीड जिल्हा केंद्री" केल्या .. बीड मध्ये अर्धी ताकद लावणे आणि उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात हे सूत्र वापरल्या गेले . अशा कठीण परिस्थितीत सुध्दा मुंडे साहेब कधीच डगमगले नाहीत , पराभूत झाले नाहीत .

२०१४ च्या लोकसभेला मात्र परिस्थिती मुंडे साहेबांच्या बाजूने होती . " मुंडे साहेबांच्या विरोधात उभा रहा म्हणले तर राष्ट्रवादी च्या नेत्यांच्या चड्या पिवळ्या होत होत्या " ( हे वाक्य २०१४ ला साहेबांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या सुरेश धस यांचे आहे ) . मुंडे साहेबांच्या दहशतीने संभावित पराभव समोर दिसत असल्याने स्वतः शरद पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेत राज्यसभा गाठली आणि मुलीच्या जागेसाठी अंधारात मोदींची शरणांगती पत्करली होती. महादेव जानकरांच्या उमेदवारीला पंकजाताई यांच्या झंझावाती प्रचाराची जोड मिळाली. बारामतीत पवार कन्येचा विजय झाला खरा पण साडे तीन लाखांचे मताधिक्य सत्तर हजारांवर आले. लोकसभा निवडणुक संपली देशात आणि महाराष्ट्रात सत्तांतर झाले परंतु दुर्दैवाने साहेब आपल्यातून गेले .

मृत्युनंतर वैर संपते म्हणतात परंतु साहेबांच्या जिवंतपणी जे आपल्याला जमले नाही ते त्यांच्या माघारी करू असा असुरी विचार करणारे आजही त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करतात परंतु साहेबांच्या केलेल्या सत्कार्यांच्या जोरावर परत परत तोंडावर आपटतात.  मुंडेसाहेबांच्या पुतण्यावर पवारांची अनाठायी भिस्त असनं आणि त्यापायी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे तीन चार तुकडे पडणं हा पवारांना फटके देणारा काळाचा आसुड आहे.

आज मुंडे साहेबांच्या विरोधात अख्खी हयात घालवलेले विरोधक त्यांचे अनुकरण करत आहेत.. स्वतः वायफळ आरोप करणार्‍या अजित पवार यांनी मुंडे साहेबांचे तेच "वलय" पाहून "संघर्षयात्रा" काढली आहे.

साहेबांच्या संघर्ष यात्रेची आठवण ताजी करणारी तितकाच जनतेचा पाठिंबा मिळालेली संघर्ष यात्रा पंकजाताईंची ठरली होती .सत्तर विधानसभा मतदारसंघांवर पंकजाताईंच्या संघर्ष यात्रेनं विजय मिळवून दिला. एकट्या पंकजाताईंनी काढलेल्या संघर्षयात्रेची आणि आताच्या समस्त विरोधकांनी मिळून काढलेल्या संघर्षयात्रेची तुलना करता पंकजाताईंच्या संघर्षयात्रा च्या 10% हि लोकांचा पाठींबा या यात्रेस मिळताना दिसत नाही.

लोकांप्रती कळवळा आणि प्रेम र्‍हदयात आणि रक्तात नसल्याने हा संघर्ष सरळ सरळ विरोधकांना झालेला 'संसर्ग' भासतोय. जनकल्याणाची तळमळ असेल तर कोणत्याही यात्रा यशस्वी होत असतात. नाहीतर अशा कितीही "संघर्षयात्रा" काढल्या तरी त्या यात्रांचा असाच फज्जा होणार आणि त्या संघर्षयात्रा ऐवजी #संसर्गयात्रा भासणार यात शंकाच नाही..

~■ संदीप नागरगोजे , गंगाखेड ■~

Comments

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

*भगवानगडाचे गद्दार मंबाजी*

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य  निर्माण केलं पण त्यासाठी पोषक वातावरण हे शिवजन्मापुर्वीच्या संतांनी केलं होतं. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत सर्वांनीच कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून लोकपदेश करत समाज जागृती केली . जाती व्यवस्थेत वाटल्या गेलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे पुण्यकार्य केले . ज्याचे फळ  अठरापगड जाती धर्मातील लोकांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला स्वराज्यानिर्मीतीच्या कार्यात झोकून दिले ; प्रसंगी स्वराज्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली . शिवाजीराजाला कधी न बघितलेली लोक पण त्या राजावर जिव ओवाळून टाकण्यासाठी तत्पर असत.  कारण शिवाजी राजाच्या कार्याची महती सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य तुकारामांसारख्या संतानी केले आणि समाजात स्वराज्याविषयी  आस्था आणि आपलेपणाची भावना निर्माण केली . स्वतः शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊनी अनेकवेळा अशा अनेकांचे सत्कार केले . संत तुकारामांची ख्याती ऐकून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सत्कार स्वीकारण्यासाठी राजदरबारी येण्याचे आवाहन केले होते . पण तुकारामांनी ते प्रांजळपणे नाकारले ह...