Skip to main content

महाराष्ट्राचे सर्वोत्तम गृहमंत्री : लोकनेते गोपीनाथराव मुंडे

गोपीनाथगड....
परळी वैजनाथ जवळील लोकनेते मुंडे साहेबांच्या या समाधीस्थळाला गेल्या दोन वर्षांपासुन १२ डिसेंबर रोजी भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त होत आहे. १२ डिसेंबर हा लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे साहेबांचा जन्मदिवस.
इ.स. १९४९ मध्ये याच दिवशी परळी वैजनाथ जवळ असलेल्या नाथ्रा या गावी गरीब शेतकरी कुटुंबात साहेबांचा जन्म झाला.
याच दिवसापासून सामान्यांतून येवून असामान्य बनलेल्या या संघर्षयोध्याच्या थक्क करणार्‍या  प्रवासाला सुरुवात झाली. 

विद्यार्थ्यी दशेपासूनच गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन ह्या जिगरी दोस्तांची जोडी सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेवून सामाजिक कार्यात उतरली होती .
याच जोडीने पुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबती महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले. आणि यात सिंहाचा वाटा तो लोकनेते मुंडे साहेबांचा.

राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर रान पेटवुन त्यांनी भ्रष्टाचार आणि सत्तेच्या माजात धुंद असलेल्या तात्कालिन सरकारला मुळासकट उपटून फेकण्याचे काम लोकनेते मुंडे साहेबांनी केले .

शिवनेरी ते शिवतीर्थ अशी 'संघर्ष यात्रा' काढून राज्यात पहिल्यांदाच शिवसेना - भाजप युतीचे सरकार आले.

१४ मार्च १९९५ रोजी युतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला . लोकनेते मुंडे साहेबांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली .
ठरल्याप्रमाणे शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद गेले मात्र लोकांचे आकर्षण मनोहर जोशी यांच्यापेक्षा जास्त हे मुंडे साहेबच होते .
युतीच्या जागावाटपावरून मुंडेसाहेबांनी गृहमंत्री,उर्जामंत्री, पाटबंधारे मंत्री आणि कालावधीसाठी वित्तमंत्री पदावर काम केले .
खरं तर जागावाटपावरून भाजपकडे महसूल खाते येणार होते .
परंतु महाराष्ट्रातील वाढलेली गुन्हेगारी बंद करण्यासाठी मुंडे साहेबांनी महसूल खात्याऐवजी गृहमंत्रालय घ्यावे अशी बाळासाहेबांची इच्छा होती .
मुंडे साहेबांच्या क्षमतेवर बाळासाहेबांचा प्रचंड विश्वास होता म्हणून साहेबांनी महसूल ऐवजी गृहमंत्री पद आपल्याकडे घेतले.

१९९२ ते १९९४ च्या कालखंडात महाराष्ट्रात गुन्हेगारी ने थैमान घातले  होते . सभागृहातील त्यावेळेच्या तीन सदस्यांची आमदार विठ्ठल चव्हाण , आमदार प्रेमकुमार शर्मा आणि आमदार रमेश मोरे यांच्या निर्घृण हत्या करण्यात आल्या होत्या. मुंबई बॉम्बस्फोटात शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते तर त्याहीपेक्षा जास्त लोक कायमचे अपंग होवून बसले होते . जळगावात याच काळात महिलांची क्रूरपणे अब्रु लुटणारे वासनाकांड सुध्दा झाले होते .
अचानक कुठेही समाजकंटक दंगली घडवुन जनसामान्यांच्या मालमत्तेची लुटमार करण्यास निर्ढावलेले होते.
पोलिसांवर हल्ले होत होते .परंतु सरकार मात्र सुस्त पडलेले.
मुंडे साहेबांनी " शिवनेरी ते शिवतीर्थ " या संघर्ष यात्रेत याविषयी सरकार वर जोरदार प्रहार चढवला होता .
शरद पवारांना मॅनेज न होणारा पहिला विरोधी पक्षनेता म्हणुन मुंडे साहेबांनी ओळख तयार केली होती.

या पार्श्‍वभूमीवर राज्याला एका मजबुत आणि कणखर गृहमंत्र्याची गरज होती आणि त्या जागी मुंडे साहेबांच्या सारखा दुसरा कोणताही नेता चालणार नाही हे बाळासाहेब आणि प्रमोद महाजनांच्या लक्षात आले होते . साहेबांनी ती जबाबदारी फक्त स्विकारली नाही तर गृहमंत्रालयाची सुत्रे हाती घेताच मुंबई आणि महाराष्ट्राला गुन्हेगार मुक्त करण्यासाठी कडक धोरणाची अंमलबजावणी सुरू केली.

"महाराष्ट्रात कायदा कोणालाही हाती घेवू दिल्या जाणार नाही, हे राज्य कायद्याचे आहे गुन्हा करणारी व्यक्ती कोणीही असो , ती कितीही मोठी असली तरी तिला गुन्हा केल्यास अटक केल्याशिवाय राहणार नाही . गुन्हेगारांना कधीच जात नसते गुन्हेगार फक्त 'गुन्हेगार' असतो अशी त्यांची भुमिका होती .

महाराष्ट्राला गुन्हेगारीमुक्त करण्याचा साहेबांनी निर्धारच केला होता. अंडरवर्ल्डच्या जबड्यात अडकलेल्या मुंबई मधून अंडरवर्ल्डचा सफाया मुंडे साहेबांनीच केला . दहशतवादी दाऊद इब्राहिम च्या १९ स्पेशल शुटर्सना यमसदनी पाठवले .  १४ मार्च १९९५ ते १७ ऑक्टोबर १९९९ पर्यंत च्या मुंडे साहेबांच्या कार्यकाळात ४५० ते ५०० गुंडांचे एन्काऊंटर झाले . आणि साहेबांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुंबई आणि महाराष्ट्रातून अंडरवर्ल्डचा खात्मा केला.
अरुण गवळी च्या गॅन्ग ला देखील ठेचुन काढताना मुंडे साहेबांनी मित्रपक्षाचा दबाव झुगारुन टाकला होता.
मुंडे साहेबांच्या घरी थेट दुबई येथुन धमक्यांचे फोन यायचे म्हणे..
परंतु त्यांनी त्या धमक्यांना भिक न घालता पोलीस खात्याचे मनोबल ऊंचावुन संघटीत गुन्हेगारीची पाळंमुळं खणुन काढली.
महाराष्ट्र दंगलमुक्त करण्याचे श्रेय देखील मुंडे यांच्या कारकिर्दीतच दडलेले आहे.
अद्वितीय लोकनेते असलेले गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे सर्वोत्तम गॄहमंत्री आहेत हे त्यांचे विरोधक देखील मान्य करतात.

● संदीप प्रभाकर नागरगोजे , गंगाखेड ●

Comments

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

*भगवानगडाचे गद्दार मंबाजी*

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य  निर्माण केलं पण त्यासाठी पोषक वातावरण हे शिवजन्मापुर्वीच्या संतांनी केलं होतं. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत सर्वांनीच कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून लोकपदेश करत समाज जागृती केली . जाती व्यवस्थेत वाटल्या गेलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे पुण्यकार्य केले . ज्याचे फळ  अठरापगड जाती धर्मातील लोकांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला स्वराज्यानिर्मीतीच्या कार्यात झोकून दिले ; प्रसंगी स्वराज्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली . शिवाजीराजाला कधी न बघितलेली लोक पण त्या राजावर जिव ओवाळून टाकण्यासाठी तत्पर असत.  कारण शिवाजी राजाच्या कार्याची महती सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य तुकारामांसारख्या संतानी केले आणि समाजात स्वराज्याविषयी  आस्था आणि आपलेपणाची भावना निर्माण केली . स्वतः शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊनी अनेकवेळा अशा अनेकांचे सत्कार केले . संत तुकारामांची ख्याती ऐकून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सत्कार स्वीकारण्यासाठी राजदरबारी येण्याचे आवाहन केले होते . पण तुकारामांनी ते प्रांजळपणे नाकारले ह...