Skip to main content

*दुष्काळमुक्तीचा मुंडे पॅटर्न ---- ग्रामविकासाची जलयुक्त क्रांती...*

          लोकनेते मुंडे साहेबांच्या कल्पनेतून साकारलेल्या आणि  पंकजाताई मुंडे यांनी परळी वैजनाथ येथे  २००९ सालापासून वैद्यनाथ पॅटर्न नावे राबवलेल्या जलयुक्त शिवार अभियानाकडे आज महाराष्ट्रासह देशभरातून " दुष्काळमुक्तीचे ब्रम्हास्त्र " म्हणून पहिल्या जात आहे . सत्ता आल्यानंतर आपल्याला कोणत्या कार्याला प्राधान्य द्यायचे आहे , कोणती कामे तात्काळ सुरु करायची आहेत याची यादीच मुंडे साहेबांकडे होती. सत्ता तर अली परंतु दुर्दैवाने साहेब आपल्यात राहिले नाहीत ,  साहेबांचे स्वप्न साकार करण्याची शपथ घेऊन साहेबांचा वारसा चालवणाऱ्या पंकजाताईंनी मुंडे साहेबांप्रमाणेच लोकहिताची कामे करण्यास सुरुवात केली , त्याचेच एक उदाहरण म्हणजे महाराष्ट्र शासनाचे सर्वात नावाजलेले आणि लोकोपयोगी ठरत असलेलं जलयुक्तशिवार अभियान होय ..

२०१४ च्या उत्तरार्धात देवेन्द्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वात प्रथम पंकजाताईंनी जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्रात राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली . ७० हजार कोटी खर्च करून सुद्धा पाणी साठवण्यात पूर्वीचे सरकार सपशेल अपयशी ठरलेले असल्यामुळे एवढ्या कमी पैशात हे अभियान कसे काय राबवले जाईल हा प्रश्न सर्वांनाच पडलेला होता त्यामुळे जलयुक्तची सुरुवातीला कोणी जास्त दखलही घेतली नाही , त्यातच  २०१४ - २०१५ ला या अभियान अंतर्गत कामे तर भरपूर झाली पण महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट येऊन उभे राहिले . गतवर्षी जेवढाही काही पाऊस झालेला होता त्यात जलयुक्त शिवार ने बरीच कमाल केली आणि लोकांना या अभियानात उस्फुर्त सहभाग घेण्याची ऊर्जा मिळाली. यापूर्वी कोणत्याही सरकारी योजनेला जेवढा लोकसहभाग मिळाला नसेल तो जलयुक्त शिवारस मिळाला आहे . अगदी ताज्या आकडेवारीनुसार *राज्यात ११ हजार ४६५ गावांमध्ये जलयुक्त अंतर्गत गेल्या दोन वर्षांत ना.पंकजाताई यांच्या जलसंधारण खात्याच्या कारकिर्दीत अंतर्गत सुमारे अडिच लाखांहून अधिक कामे पूर्ण झाली असून सुमारे २९ हजार ३१७ कामे प्रगतीपथावर आहेत . या सर्व कामांमधून सुमारे ३८ टीएमसी एवढा मोठा जलसंचय अपेक्षित आहे.*

गाळ काढणे, खोलीकरण , रुंदीकरणाची सरकारी यंत्रणे तर्फे १० हजार  २३४ आणि लोकसहभागातून ७ हजार ४२४ कामे घेण्यात आली . लोकसहभागातून ६७९.१६ तर सरकारी यंत्रणे मार्फत ४५७.६५ लाख घनमीटर गाळ काढण्याचे काम झाले,  याशिवाय १ हजार ७८७ कि.मी खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम सरकारी यंत्रणांनी केले आहे तर तेच काम लोकसहभागातून  १ हजार ५१४ कि.मी एवढे झाले आहे.

सरकारी यंत्रणेमार्फत ३८४ कोटी ५४ लाख रुपये खर्च या कामांवर करण्यात आला असून लोकसहभागातून ४७३ कोटी ११ लाख रूपयांची कामे झाली आहेत . मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी सर्वात जास्त निधी उपलब्ध झाला आहे..

गेल्या काही दिवसांपासून  लातूर, बीड, उस्मानाबाद या दुष्काळाने होरपळलेल्या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. या पावसातच जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे सततच्या दुष्काळाने हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जलयुक्त शिवार अभियानाकडून समाधान  व्येक्त केले जात आहे.
मंत्रीमंडळ विस्ताराच्या आगोदर *पंकजा मुंडे* पालकमंत्री असलेल्या लातूर व बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाचे सर्वोत्कृष्ट काम झाले असून, निवडण्यात आलेल्या २०२पैकी आतापर्यंत १०६ गावांत, तर बीड जिल्ह्यात निवडलेल्या २७१ गावांपैकी १०२ गावांमध्ये शंभर टक्के कामे पूर्ण झाली आहेत.

मराठवाड्यात ४५६ गावांमध्ये ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ३६२ गावात ७०  टक्क्यांपेक्षा आधिक कामे झाली आहेत.

विभागातील ४५६ गावांमध्ये ८० टक्के तर, ३६२ गावांमध्ये ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत.

*मराठवाड्यात जलयुक्त शिवारची शंभर टक्के पुर्ण झालेली गावे*

जिल्हा.....एकूण गावे.... १००% गावे
औरंगाबाद......२२८.............०१२
जालना..........२०९..............००५
परभणी.........१७०..............०१९
हिंगोली..........१२४..............०००
*लातूर*..........२०२..............१०६
*बीड*.........२७१..............१०२
नांदेड...........२६१...............०२७
उस्मानाबाद....२१७...............०७२
एकूण...........१६८२.............३४३

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आतापर्यंत ७२७०२ कामांचे नियोजन करण्यात आले असून, त्यापैकी ४८१५२ कामे पूर्ण झाली आहेत.
अजूनही प्रगतीपथावरील जवळपास २४ हजार कामे पूर्ण करणे बाकी आहेत.

२०१६-१७ या वर्षांसाठी नवीन दीड हजार गावांची निवड पूर्ण झाली आहे.
अभियानातील कामांमुळे विहिरींच्या पाणीपातळीत २.७५ मीटरपर्यंत वाढ झाली असून, प्रत्यक्षात १.१६ लाख टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते.

शिल्लक गावांची मोठी संख्या पाहता तत्काळ कामे पूर्ण होणाऱ्या गावांची वेगळी यादी तयार करण्यात आली असून, या गावामध्ये डेडलाइनपूर्वी कामे पूर्ण करण्यात येणार आहे.

       महाराष्ट्रात दुष्काळाची सर्वात जास्त झळ पोहोचली ती मराठवाड्याला . १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भयानक परिस्थिती  मराठवाड्यातील जनतेने अनुभवली सतत ३ - ४ वर्ष दूषकळजन्य परिस्थितीने जनता हैराण झालेली असताना मराठवाड्यात जलयुक्त शिवाराची भरपूर कामे झाली . दुष्काळाशी मुकाबला करत करत लोकांनी लोकसहभागातून या योजनेत आपले भरीव योगदान दिले , आणि त्याचेच मधुर फळ आता पाण्याच्या रूपाने दिसत आहे .. जलयुक्त शिवार अंतर्गत बांधलेली बंधारे ओसंडहून वाहत आहेत . काही वर्षांपूर्वी परळी पुरता मर्यादित वैद्यनाथ पॅटर्न आज देशभरात राबवला जातोय . शिवार जलयुक्त झाले आहे . एकंदरीत लोकनेते मुंडे साहेबांचे एक स्वप्न सत्यात साकारले जात आहे..

- संदीप प्रभाकर नागरगोजे, गंगाखेड

Comments

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

*भगवानगडाचे गद्दार मंबाजी*

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य  निर्माण केलं पण त्यासाठी पोषक वातावरण हे शिवजन्मापुर्वीच्या संतांनी केलं होतं. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत सर्वांनीच कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून लोकपदेश करत समाज जागृती केली . जाती व्यवस्थेत वाटल्या गेलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे पुण्यकार्य केले . ज्याचे फळ  अठरापगड जाती धर्मातील लोकांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला स्वराज्यानिर्मीतीच्या कार्यात झोकून दिले ; प्रसंगी स्वराज्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली . शिवाजीराजाला कधी न बघितलेली लोक पण त्या राजावर जिव ओवाळून टाकण्यासाठी तत्पर असत.  कारण शिवाजी राजाच्या कार्याची महती सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य तुकारामांसारख्या संतानी केले आणि समाजात स्वराज्याविषयी  आस्था आणि आपलेपणाची भावना निर्माण केली . स्वतः शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊनी अनेकवेळा अशा अनेकांचे सत्कार केले . संत तुकारामांची ख्याती ऐकून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सत्कार स्वीकारण्यासाठी राजदरबारी येण्याचे आवाहन केले होते . पण तुकारामांनी ते प्रांजळपणे नाकारले ह...