Skip to main content

ते आठवणीतले दिवस...!!!

२०११ च्या उत्तरार्धात काॅलेज च्या परिक्षा संपल्यानंतर काॅलेज चे सर्व मित्र  ( मैत्रीणीसुध्दा ) आपापल्या गावी निघून गेले होते त्यामुळे कशातच मन लागत नव्हतं त्यातच नाना चाटे , संतोष मुंढे  आणि राजेश मुंढे या  माझ्या मित्रांनी मला त्यांच्यासोबत औरंगाबाद ला येण्याची ऑफर केली .. नाना काॅलेज ला होता तर राजेश वोडाफोनच्या काॅल सेंटर मध्ये पार्टटाईम जाॅब करायचा ( संतोषने तु यांच्यासोबत पुढे जा मी नंतर येतो म्हणून खो दिला आणि तो भाऊ काही औरंगाबाद ला आलाच नाही ) ... जायकवाडीत मुंढे मामांच्या कॅन्टीनवर राजेश आणि नाना सोबत जायचा प्लॅन निश्चीत झाला त्यात प्रा.खंटिंग ( दुर्दैवाने तो आता आपल्यात नाही ) आणि गणेश भोसले या मित्रांनी पण या निर्णयाला पाठिंबा दिला ... घरच्यांना आठ दिवस फिरून येतो सांगितलं आणि मी नाना आणि राजेश सोबत औरंगाबाद ला पोहोचलो ..

नामांकित धुत हाॅस्पीटल च्या थोडं आत मध्ये अमृत डेव्हलपर्स नावाच्या इमारतींमध्ये मित्रांनी चांगला फ्लॅट भाड्याने घेतलेला होता .. शिवाय तिथे संदीप मावसकर आणि इतर काही चांगले मित्र भेटले होते .. मित्रांच्या सहवासात दिवस कसे मजेत निघून जात होते .. आठ दिवस राहायचे ठरवून आलेलो मी पंधरा दिवस तिथेच पडून होतो ..  सकाळी आकरापर्यंत झोप नंतर उठून कुठे तरी फिरून येणं आणि संध्याकाळी औरंगाबाद च्या कॅनोट परिसरात , प्रोझोन माॅल मध्ये किंवा मग पिक्चर बघायला जाणे आणि रात्री उशीरापर्यंत हिंडने असा रोजचा क्रम चालु होता ...

त्यातच मी वोडाफोन काॅलसेंटर कडे फिरायला गेलो असताना तिथे नवीन मुलांसाठी मुलाखती सुरू असल्याचे कळले  .. आपण पण बघु काय असतंय ते म्हणत लगेच बायोडाटा बनवून मी पण रांगेत लागलो आणि तिथं माझं सिलेक्शन झालं.. पण २००७ पासून माझ्याकडे आयडिया कंपनीचे कार्ड होते त्यामुळे ला वोडाफोन पेक्षा आयडिया कंपनीविषयी जरा जास्त ओढ होती शिवाय महत्वाचे म्हणजे तिथे वोडाफोन पेक्षा जास्त पगार पण होता . म्हणून तिथे मुलाखतीला जावून यायचे ठरवले .. इकडे वोडाफोन वाल्यांचे जाॅईन होण्यासाठी सतत काॅल सुरू होते पण त्यांना मी काही कारणे सांगून पाच सहा दिवसांनी येण्याचे सांगितले होते ..

वोडाफोन वाल्यांपेक्षा इथे जरा कडक मुलाखत घेतली जात होती आणि महत्वाचं म्हणजे तिथे डिएड वाल्यांना  शक्यतो टळले जात होते .. पण तिथंही मला मुलाखतीत सिलेक्ट करण्यात आलं आणि मी जाॅईन होवून ग्राहकांचे काॅल घेण्याची  ट्रेनिंग घ्यायला लागलो ट्रेनिंग मध्ये चांगल्या गुणांनी पास होवून मी आठ तासाच्या ड्युटी साठी पात्र झालो ..

दिवसाचे ग्राहकांचे शेकडो फोन यायचे त्यात जास्त फोन बॅलन्स कट झाल्याबद्दलचे असायचे ..( रात्रीच्या शिफ्ट मध्ये काही मुली विनाकारण टाईमपास करण्यासाठी काॅल करायच्या तो भाग सोडा )  काही लोक तर फोनवर अक्षरशः रडायचे .. ( ज्याची दिवसाची मजुरी १५० रूपये असेल आणि त्याचे कोणी जर विनाकारण १०० रूपये कापत असेल तर तो बिचारा दुसरं काय करणार ? ) मी पहिल्यापासूनच जरा जास्तच भावनिक असल्याने अशा कारणांमुळे खुप दुःख व्हायचं .. ट्रेनिंग मध्ये शक्यतो कुणाचे पैसे वापस करायचे नाही असं शिकवलेलं होतं आणि जो कर्मचारी कुणाचीही पैसे सहज वापस करत असेल त्याला ऑफिस मध्ये बोलावून घेवून सक्त ताकीद दिली जायची ..

मी ठरवलं !!! कि आपल्याला अशा क्षेत्रात करिअर करायचे नाही त्यामुळे आपल्याला शक्य होईल तेवढ्या लोकांना आपण त्यांचे पैसे परत करायचे .. ( नौकरी गेली तरी चिंता होतीच कुणाला ? शिवाय वोडाफोन वाले वेटिंग वरच होते ) . मी तिथे नोकरीला असताना माझे सुध्दा पैसे विनाकारण कंपनीने दोन तीन वेळा कापले होते तर बाकि लोकांच काय ? असा प्रश्न मला नेहमीच पडत होता ...

मी आठ तासांची ड्युटी कमीत कमी नऊ तास करून कंपनी कडून वाहवा मिळवत होतो ( यात कंपनीचा डबल घाटा होता .. एक तर ग्राहकांचे पैसे परत करत होतो आणि दुसरं म्हणजे माझी पगार )..  आपले पैसे परत मिळाल्यावर ग्राहक पण माझी प्रशंसा करायचे आणि नंतर कंपनीकडून येणार्‍या SMS ला Y चा रिप्लाय न चुकता पाठवायचे ..

वैयक्तिक पातळीवर विचार करता मी इथुन खुप काही शिकलो , काही चांगल्या सवयी लागल्या आणि चुकीच्या सवयी घालवल्या सुध्दा.. पुढे काही दिवसांनी  ( तीन चार महिन्यांनी ) माझा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि मी त्या मेट्रो लाईफ ला रामराम ठोकला..!!!!!

हे सर्व म सांगण्याचा उद्देश कि हे कंपनीवाले ग्राहकांना कसं लुटतात हे दाखवणे होता... काही दिवसांपूर्वी  काॅल ड्राॅपसाठी ट्रायने ग्राहकांना मोबाईल कंपनी वाल्यांनी ग्राहकांचे पैसे वापस करावेत आसा निर्णय घेतला होता आणि या निर्णयाला कोर्टाने स्थगिती दिली आहे .. आता ह्या सर्वच कंपन्या बिनधास्तपणे ग्राहकांना पहिल्यासारखंच मनसोक्त लुटणार आहेत यात काहीच शंका नाही...

माझं हे सर्व रामायण मन लावून  वाचल्याबद्दल आपले आभार ... 😝😝😝

🙏🏻आपलाच :- संदीप नागरगोजे 😎

Comments

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

*भगवानगडाचे गद्दार मंबाजी*

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य  निर्माण केलं पण त्यासाठी पोषक वातावरण हे शिवजन्मापुर्वीच्या संतांनी केलं होतं. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत सर्वांनीच कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून लोकपदेश करत समाज जागृती केली . जाती व्यवस्थेत वाटल्या गेलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे पुण्यकार्य केले . ज्याचे फळ  अठरापगड जाती धर्मातील लोकांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला स्वराज्यानिर्मीतीच्या कार्यात झोकून दिले ; प्रसंगी स्वराज्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली . शिवाजीराजाला कधी न बघितलेली लोक पण त्या राजावर जिव ओवाळून टाकण्यासाठी तत्पर असत.  कारण शिवाजी राजाच्या कार्याची महती सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य तुकारामांसारख्या संतानी केले आणि समाजात स्वराज्याविषयी  आस्था आणि आपलेपणाची भावना निर्माण केली . स्वतः शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊनी अनेकवेळा अशा अनेकांचे सत्कार केले . संत तुकारामांची ख्याती ऐकून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सत्कार स्वीकारण्यासाठी राजदरबारी येण्याचे आवाहन केले होते . पण तुकारामांनी ते प्रांजळपणे नाकारले ह...