२१ एप्रिल १९९४ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत एका ऐतिहासिक विधेयकावर चर्चा सुरू होती .
हे विधेयक यासाठी ऐतिहासिक होते की फक्त मराठवाड्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील शोषित बहुजन समाजाची एक भावना होती की औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले जावे .
संपूर्ण सभागृहात सर्वत्र शांतता होती , नामातंर चळवळीस मराठवाडय़ात उग्र रूप प्राप्त झाले होते .मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे का गरजेचं आहे या विषयी सभागृहात एक आवाज घुमत होता.
सर्व सदस्य शांतपणे महाराष्ट्राच्या या तरुण जिगरबाज योध्द्याचे भाषण ऐकत होते. तो आवाज होता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा .
आपल्या भाषणात ते म्हणतात
"भारतीय राज्यघटनेने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य सामान्य, शोषित, दलित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. समाजातील भेदभाव , अस्पृश्यता या विरोधात आवाज उठवाला . समाजातील आर्थिक विषमता दुर करण्यासाठी प्रयत्न केले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर या शोषित समाजाला न्याय मिळाला नसता .. मराठवाड्या सारखा मागासलेला भाग शैक्षणिक दृष्ट्या हजारो मैल दुर गेला असता ".
मराठवाड्याच्या विकासासाठी तात्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते २३ आॅगस्ट १९५८ साली विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती.
त्यावेळीच मराठवाडा विद्यापीठाला आंबेडकरांचे नाव देण्यात यावे यासंबंधी काही प्रस्ताव आले होते. आंबेडकर यांच्या बरोबरच संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि स्वामी रामानंद तीर्थ इत्यादी महापुरुषांची नावे सुध्दा चर्चेत होती .
यावेळी माय मराठी चा जन्म या भागात झाला म्हणून विद्यापीठास "मराठवाडा विद्यापीठ " असे नाव देण्याचा निर्णय घेतला होता.
नामांतर चळवळीशी मुंडे साहेबांची नाळ फार पुर्वी पासून जोडली गेली होती.
वास्तविक पाहता लोकनेते गोपीनाथराव मुंडे विद्यार्थी चळवळीपासूनच नामांतर चळवळीशी निगडीत होते .
नामातंराचा विषय ज्या वेळी धगधगता होता तेंव्हा इ.स.१९८० मधील प्रसिद्ध लाँगमार्च ज्याचं नेतृत्व प्रा.जोगेंद्र कवाडे , बाबा आढाव करत होते त्यात राजकिय मतभेद बाजूला ठेवून गोपीनाथराव मुंडे सहभागी झाले होते .
मुंडे साहेबांना १९७९ रोजी नाशिक येथे नामातंर चळवळीत अटक करण्यात आली होती.
त्यानंतर ही १९८३ दलित पँथर ने नामातंर चळवळीसाठी सत्याग्रहाचा आवाज दिला . त्यावेळी त्यास जाहीर पाठिंबा देणारे मुंडे साहेब भाजपचे मराठवाड्यातील एकमेव आमदार होते .
नामातंर साठी जेलभरो आंदोलनात आठवले यांच्या सोबत ही मुंडे साहेब आघाडीवर होते .या विषयी रामदास आठवले सांगतात कि
" मुंडे साहेब केवळ विचारांच्या पातळीवर पक्षात वावरले नाहीत तर सर्वसामान्य, बहुजन आणि दलित समूहाच्या भावभावनांशी नाळ जुळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नामातंर साठी आम्ही जो संघर्ष केला त्यात मुंडे साहेब सर्व शक्तीने सहभागी झाले आणि येरवडा कारागृहात १४ दिवस तुरुंगवास भोगला"
त्यावेळी नामातंर वादी आणि नामातंर विरोधी असे दोन प्रवाह होते . आंबेडकरांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्यात यावे अशी भुमिका काहींनी सभागृहात मांडली त्यावेळी आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यायला हवे अशी ठाम भूमिका मुंडे साहेबांनी घेतली . यावर बोलताना ते म्हणाले कि ""शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्यात बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालय सुरू केले त्यामुळे शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितले होते की नागपूर, मुंबई या ठिकाणी आपण महाविद्यालय काढतो पण मराठवाडा मागासलेला विभाग आहे. मागासलेला लोकांना शिक्षणाची संधी मिळाली पाहीजे म्हणून महाविद्यालय सुरू केले ".
१४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाला "" डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ "" असे नाव दिल्याची घोषणा केली गेली आणि महाराष्ट्रात नामातंराच्या श्रेयासंबंधी उलट सुलट चर्चा सुरू झाली.. परंतु प्रत्यक्षात नामातंर चे श्रेय हे मराठवाड्यातील जनतेचे आहे असे स्पष्ट मत मुंडे साहेबांनी मांडले..
विद्यापीठाला आंबेडकरांचे नाव दिल्याने मराठवाड्याची आस्मिता कमी होईल म्हणणारे नेते नामातंर चे श्रेय घेण्याची घिसाडघाई करत होते आणि मुंडे साहेब मात्र नामातंर चे श्रेय मराठवाड्यातील जनतेला देत होते . आंबेडकरांचे नाव विद्यापीठाला दिल्याने आज मराठवाडा गौरवांकीत झाला आहे असे उद्गार त्यावेळी साहेबांनी काढले होते.
नामांतराची स्विकारार्हता वाढवण्यासाठी १९९३ ला संपूर्ण मराठवाड्याच्या दौरा करून मराठवाड्यातील जेष्ठ नेते , लोकप्रतिनिधी समाजसेवक, राजकिय पक्ष, विवीध सेवाभावी संस्था आणि नागरिकांशी चर्चा करून मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले जावे यासंबंधी चा प्रस्ताव १३ डिसेंबर १९९३ रोजी मांडला होता.
मराठवाडय़ात जातीय तणाव निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून मराठवाडय़ात फिरलेले विरोधी पक्षनेते गोपीनाथराव मुंडे हे होते.
विवेकी विरोधकाचे हे उदाहरण आजच्या महाराष्ट्रात लोप पावल्याचे धडधडीत दिसत असुन केवळ मुंडेच्या पश्चात त्यांच्या वारशाच्या धास्तिपोटी अविवेकी विरोध करण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदाचा ऊपयोग होताना दिसतोय.
बहुजनांच्या सन्मानासाठी पद पक्ष प्रतिष्ठा पणाला लावून झगडणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरस्तंभावर कोरलेलं नाव हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे.
● संदीप नागरगोजे , गंगाखेड ●
JAY BHAGWAN
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteNice
ReplyDeleteजबरदस्त
ReplyDeleteग्रेट
ReplyDeleteवा मस्त संदीपराव...
ReplyDeleteJay Bhagwan Jay Gopinath
ReplyDelete