Skip to main content

भगवानगडाचे चांगदेव आणि मुक्ताई

महाराष्ट्रातील आणि विशेषतः मराठवाड्यातील उसतोड, कष्टकरी समाजाचे आराध्य दैवत आणि श्रध्दा श्रध्दास्थान म्हणजे श्री क्षेत्र भगवानगड .
कष्टकरी उसतोड कामगारांना
ऊर्जा देणार्‍या भगवानगडा बाबत मागच्या काही दिवसांपासून चर्चेचं गुर्हाळ सुरु झालय.
याची सुरूवात स्व.गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस स्मृतीस्थळ असलेल्या "गोपीनाथगड" वरून झाली .
१२ डिसेंबर रोजी गोपीनाथगड वर झालेल्या कार्यक्रमात भगवानगडाचे महंत डाॅ.नामदेव शास्त्रींनी पंकजा आता राजकीय निर्णय गोपीनाथगडावरूनच जाहीर करेल असे सुतोवाच दिले होते.
काही दिवसांनी "भगवानगडावरील दसरा मेळावा बंद" अशी बातमी आली आणि भगवान बाबा आणि लोकनेते गोपीनाथ मुंडेंचे अनुयायी  भगवानगडाच्या विश्वस्त मंडळाच्या विरोधात भडकले.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय दसरा मेळावा अशी कधी कल्पना सुध्दा गडाच्या भक्तांनी केलेली नव्हती त्यांच्या अचानक जाण्याने त्यांची जागा पंकजा मुंडे यांना घ्यावी लागली . भगवानगडावरून ही पंकजा गडाची कन्या असं जाहीर करण्यात आले होते ..

या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी काल भगवानगडावर जावून भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि एकतर्फी निर्णय घोषित करणार्‍या महंत नामदेव शास्त्री यांचेही चरणस्पर्श करून आपल्या परिपक्वतेची चुणूक दाखवली.

चांगदेवाच्या अहंकाराला मुक्ताबाई ने भिंतीवर बसुन जावून चांगदेवाच्या अहंकाराचे केलेले गर्वहरण या घटनेवरून आठवतेय फरक एवढाच आहे की भगवानगडाचे चांगदेव ज्या वाघावर आरूढ झालेले आहेत तो वाघ फक्त अहंकाराच्याच भुश्याने भरलेला आहे आणि ज्या भिंतीवर पंकजा मुंडे आरूढ होताच भिंतीला पाय फुटले ती भिंत लोकनेते गोपीनाथ मुंडे या राजर्षी च्या वृतस्थ आयुष्याचे लेणं आहे ...

दसरा मेळावा बंद करण्याच्या निर्णयावर भगवानगडाच्या जवळपास सर्वच भक्तांनी कडाडून विरोध केला आहे .. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना ज्यांनी कुणी त्रास दिला त्याला भगवानगडावरून विशेष "प्रसाद" मिळाला आहे हा इतिहास आहे . यामुळे भविष्यात भगवानगडावर दसरा मेळावा होणार का नाही ?  आणि नाही झाला तर भगवान बाबा आणि  लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे अनुयायी या निर्णयाला स्विकारतील का पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होणार?  या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल. .

Comments

  1. काय चुकीच्या प्रतिमा वापरता राव.गल्लत होतेय काहीतरी एवढे मात्र नक्की

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

नामांतर चळवळ आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे

२१ एप्रिल १९९४ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत एका ऐतिहासिक विधेयकावर चर्चा सुरू होती . हे विधेयक यासाठी ऐतिहासिक होते की  फक्त मराठवाड्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील शोषित बहुजन समाजाची एक भावना होती की औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले जावे . संपूर्ण सभागृहात सर्वत्र शांतता होती , नामातंर चळवळीस मराठवाडय़ात उग्र रूप प्राप्त झाले होते .मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे का गरजेचं आहे या विषयी सभागृहात एक आवाज घुमत होता. सर्व सदस्य शांतपणे महाराष्ट्राच्या या तरुण जिगरबाज योध्द्याचे भाषण ऐकत होते. तो आवाज होता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा . आपल्या भाषणात ते म्हणतात "भारतीय राज्यघटनेने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य सामान्य, शोषित, दलित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. समाजातील भेदभाव , अस्पृश्यता या विरोधात आवाज उठवाला . समाजातील आर्थिक विषमता दुर करण्यासाठी प्रयत्न केले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर या शोषित समा...