Skip to main content

शोषीत बहुजनांचा गड " भगवानगड "

भारतीय संस्क्रतीत "दसरा" या सणाचं खुप महत्व आहे . महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असायचे ते महाराष्ट्राच्या दोन दिग्गज नेत्यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणांकडे .. होय लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि हिंदुऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेच ते दोन नेते . आज हे दोघेही जरी हयात नसले तरी त्यांनी सुरु केलेला दसरा मेळावा आजही साजरा होत आहे .

अत्यंत प्रतिकुल परिस्थीत गड उभारणारे आणि ढेलं इका पण शाळा शिका अशी शिकवण देणारे राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी भगवान गडाची (भगवान गडाचे पुर्वीचे नाव धौम्यगड ) उभारणी केली , बाबांच्या विचारांनी गड आणखीनच जास्त व्यापक आणि सर्वसमावेशी झालेला होता ..  बाबांच्या या शिकवणीचा परिपाक म्हणजे गडाला माननारा सर्व अठरा पगड जातींचा समाज आज उच्चशिक्षीत आणि डोळसपणे सारासार विचार करणारा आहे . कारण संत भगवान बाबांनी फक्त आध्यात्मातील सार लोकांपर्यंत पोहचवले नाही तर गडाने शिक्षणाचे महत्व जनसमान्यांत बिंबवले , समाजात असलेल्या अनीष्ठ रुढी परंपरांना कडाडुन विरोध केला ..

बीड आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सिमेवर डोंगरांत वसलेला हा भगवान गड सर्वसामान्यांसाठी माहेरघरच .. कारण या गडावर आपलेपणाची जाणीव आहे , गडावर येणाऱ्या सर्व भक्तांची , उसतोड कामगार , गरिब कष्टकर्यांची हा गड "माझा गड" आहे  अशी धारणा आसते . कारण या जनतेच्या सुख-दु:खात भगवान गड नेहमीच धावुन येत असतो .. दुष्काळात भगवान गड सरकारच्या कोणत्याही मदतीची अपेक्षा न ठेवता दुष्काळ निवारणाकरीता उपाय योजन योजतो . यावर्षीही भगवान गडाने दुष्काळग्रस्त गावं दत्तक घेतली आहेत .. पाथर्डी तालुक्यातील दिव्य आणि रुप धारण केलला भगवान गड सामान्य अतिसामान्यांनी उभा केला आहे ..

भगवान गड म्हटलं की दोन प्रतिमा प्रतिमापटलावर उभ्या राहतात , राष्ट्रसंत भगवान बाबा आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे . दसरा - भगवानगड आणि मुंडे साहेब हे एक समीकरणच बनलेलं .. बाबांच्या दर्शनानंतर लाखो लोक साहेबांना ऐकण्यासाठी दिवसभर उन्हात ठान मांडुन बसायचे .. सर्वांच्या नजरा आपल्या लोकनेत्याचे आगमन कधी होणार ? साहेबांचे हेलीकॉप्टर कधी दिसणार ? याकडे आसायच्या .. आणि आकाशात हेलीकॉप्टर चा आवाज ऐकु येताच " मंडे टु संडे , गोपीनाथ मुंडे " आसा गगनभेदी जयघोष व्हायचा . हे लिहीतानाच छाती फुगुन येते प्रत्यक्ष अनुभव तर खुपच अविस्मरणीय असायचा .. जनु मुंडे साहेब या लोकांचा श्वासच .. साहेबांच्या भारदस्त आगमनाने सर्वांचा शीन भाग कुठल्या कुठे गळुन जायचा ....

भगवान बाबांच्या समाधी चं दर्शन घेवुन साहेब स्टेजवर येताच पुन्हा सुरु झालेला गगनभेदी जयघोष थांबवने साहेबच शांत करु जाने .. गडावर साहेब नेहमीच सांगायचे , "  मी कुठेही असेल पण माझा श्वास असेपर्यंत दसऱ्याच्या दिवशी भगवानबाबांचे आणि तुमचे ( जनतेचे) दर्शन घ्यायला गडावर येणारच .. आणि साहेबांनी त्यांचे वचन शेवटपर्यंत पाळले . प्रत्येक सुख दुख:त साहेब गडावर यायचे .. आगदी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेताच साहेब गडावर भगवान बाबांच्या दर्शनासाठी येवुन गेले ..

साहेबांच्या पश्चात हा दुसरा दसरा मेळावा होतोय .. साहेबांची जागा पंकजाताईं ने घेतली आहे आणि त्या ती जबाबदारी समर्थपणे सांभाळताना दिसत आहेत  . लोक पंकजाताईंमध्ये मुंडे साहेबांना पाहात आहेत .. आज ही तितक्याच आवेशाने साहेबांचा जयघोष होतोय .. फक्त साहेब नाहीत आणि हे सत्य पचवनं मात्र खुप आवघड जातंय ..

गडावर ३० मे २०१४ रोजी देशाचे ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडेसाहेब गडाच्या आशिर्वादासाठी आलेले. दिल्ली चा गड सर करून गडाचे वैभव गडावर अगदी थाटात आलं होतं.. देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत होते. ऐतिहासिक दसरा मेळाव्यात गडावरून साहेबांना कधी मुंबई दिसे तर कधी दिल्ली.. याच संदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता साहेब म्हणाले ; "मला गडावरून पंकजा दिसतेय" तिथुन पुढे अवघ्या शंभर तासांनी साहेब आपल्याला सोडून गेलेले..

साहेबांचा शेवटचा संदेश आकाशवाणी बनुन आज जनसामान्य, दिनदुबळ्या, ऊसतोडणी मजुरांच्या कानात घुमतोय..

गतवर्षी दसरा मेळावा झाला तो  साहेबांशिवाय..
पंकजाताईंसोबत भाजपाध्यक्ष अमित शहांसमोर लाखोंचा गहिवरलेला जनसागर लोटला होता..
सत्तांतर झालं.. जानेवारी महिन्यात ना.पंकजाताई ग्रामविकास मंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून गडावर आले.
"हे राज्य भगवानगडाचेच" अशी द्वाही फिरली.. यंदाचा दसरा मेळावा २२ ऑक्टोबर रोजी गुरुवारी आहे.
भगवानगडावरून साहेबांना दिसलेल्या पंकजा आता साहेबांचं लोकनेतृत्वाचं शिवधनुष्य हाती घेऊन दसरा मेळाव्यासाठी सज्ज झाल्या आहेत.   ना.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे
लोकसेवेसाठी रणरागिनी होऊ शकतात तर दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी दुर्गावतार धारण करू शकतात याची खात्री असलेल्या जनसागराच्या कानात अजुनही गडाच्या सिंहाचे, लाडक्या मुंडे साहेबांचे वाक्य घुमतंय

"मला गडावरून पंकजा दिसतेय"..

~• संदीप नागरगोजे , गंगाखेड

( 2015 च्या दसरा मेळावा प्रसंगी )

Comments

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

*भगवानगडाचे गद्दार मंबाजी*

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य  निर्माण केलं पण त्यासाठी पोषक वातावरण हे शिवजन्मापुर्वीच्या संतांनी केलं होतं. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत सर्वांनीच कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून लोकपदेश करत समाज जागृती केली . जाती व्यवस्थेत वाटल्या गेलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे पुण्यकार्य केले . ज्याचे फळ  अठरापगड जाती धर्मातील लोकांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला स्वराज्यानिर्मीतीच्या कार्यात झोकून दिले ; प्रसंगी स्वराज्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली . शिवाजीराजाला कधी न बघितलेली लोक पण त्या राजावर जिव ओवाळून टाकण्यासाठी तत्पर असत.  कारण शिवाजी राजाच्या कार्याची महती सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य तुकारामांसारख्या संतानी केले आणि समाजात स्वराज्याविषयी  आस्था आणि आपलेपणाची भावना निर्माण केली . स्वतः शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊनी अनेकवेळा अशा अनेकांचे सत्कार केले . संत तुकारामांची ख्याती ऐकून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सत्कार स्वीकारण्यासाठी राजदरबारी येण्याचे आवाहन केले होते . पण तुकारामांनी ते प्रांजळपणे नाकारले ह...