शिक्षक पात्रता परीक्षा .. अर्थात टिईटी १५ डिसेंबर २०१३ आणि १४ डिसेंबर २०१४ या तारखांना महाराष्ट्र शिक्षक परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा घेतली , सुरुवातीपासूनच अवाढव्य फीस आकारणी पासून ते पेपर मधील प्रश्नांच्या चुका पाहता शिक्षक पात्रता घेणारे स्वतःच यात " अपात्र " झालेले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही . भावी शिक्षक हे फक्त प्रयोग करण्याचे साधन होत चालले आहे , कधी कोणता प्रयोग तर दुसराच प्रयोग .. परंतु निष्पत्ती काहीच नाही .
हि पात्रता परीक्षा घेण्यामागचा हेतू अजून स्पष्ट नाही , टिईटि निघाली त्यात सलग दोन वर्ष पात्र होऊन सुद्धा शिक्षक होण्यासाठी सीईटि कधी होणार हा मोठा प्रश्न आहे .
शिक्षक पात्रता प्रमाणपत्राची वैधता हि ७ वर्ष दिलेली आहे परंतु येणाऱ्या सात वर्षांमध्ये शिक्षक भरती होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही . शासनाचेही याकडे दुर्लक्षच दिसत आहे , सरकार बदलले तरीही परिस्थिती मात्र "जैसे थे" च आहे . सरकार या विषयी किती गंभीर आहे याचा प्रत्यय आपल्याला http://mahatet.in/ या टिईटि साठी अधिकृत असलेल्या संकेत स्थळावरून समजेल ,
यामध्ये त्यांनी सूचना टाकलेली आहे ती पाहू .. {"" NOTE : Provisional Answer keys for MAHATET-2014 are made available till 28.12.2014. Send your objection, if any to The Commissioner(MSCE), Maharashtra State Council of Examinations, 17, Dr. Ambedkar Road, Pune-411 001 by Post or Email to mahatet14@gmail.com till 28.12.2014 5.45PM ""} किती दिवसांपासून या सूचनेची वैधता संपली आहे तरीही अजून यात बदल सुद्धा केलेला नाही , संकेतस्थळकडे सुधा लक्ष द्यायला दुर्लक्ष होत असेल तर बाकीच्यांच्या गोष्टींचा विचारच न केलेला बरा ..
काहीही गरज नसताना नको तेवढ्या डीएड कोलेज ची खैरात वाटून बेरोजगारांची संख्या वाढवली , यातच दोन वर्षाचा डिप्लोमा करण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबाचे आर्थिक नियोजन सुधा ढासळले , मधेच शिक्षण संस्थांनी नको तेवढी पिळवणूक केली या अनंत यातना सहन करण्यास एकच अशा शक्ती देत होती , एकच विचार दिलासा देत होता कि मी शिक्षक झाल्यानंतर सर्व व्यवस्थि होईल . परंतु त्या आशेवर सुद्धा शिक्षक भरती बंद झाल्याने पाणी पडले .
आता शिक्षक होण्याची अशा सुधा मावळलेली होती.. ती सोडून देऊन नव्या जोमाने इतर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला काहीजण लागले त्यात अनेकांनी यश सुधा मिळवलेले आहे . बाकीच्या स्पर्धापारीक्षांचा अभ्यासक्रम आणि सिईटी/टीईटी चा अभ्यासक्रम यात खूप मोठ्या प्रमाणात भिन्नता आहे . याच्या अभ्यास करण्याच्या प्रयत्नात दुसर्या परीक्षांचा result सुधा जातो आहे . या सर्व बाबींवरून {...भिक नको पण कुत्रा आवर ..} या मराठी म्हणी प्रमाणे डीएड धारकांची अवस्था झालेली आहे .. तेंव्हा शिक्षक भरती नाही जरी काढली तरी चालेल पण निदान वेळोवेळी काहीतरी खुसपट काढून अशा दाखवणे तरी बंद करा एवढीच विनंती ..
** संदीप प्रभाकर नागरगोजे **
**** गंगाखेड , जि :- परभणी ****
हि पात्रता परीक्षा घेण्यामागचा हेतू अजून स्पष्ट नाही , टिईटि निघाली त्यात सलग दोन वर्ष पात्र होऊन सुद्धा शिक्षक होण्यासाठी सीईटि कधी होणार हा मोठा प्रश्न आहे .
शिक्षक पात्रता प्रमाणपत्राची वैधता हि ७ वर्ष दिलेली आहे परंतु येणाऱ्या सात वर्षांमध्ये शिक्षक भरती होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही . शासनाचेही याकडे दुर्लक्षच दिसत आहे , सरकार बदलले तरीही परिस्थिती मात्र "जैसे थे" च आहे . सरकार या विषयी किती गंभीर आहे याचा प्रत्यय आपल्याला http://mahatet.in/ या टिईटि साठी अधिकृत असलेल्या संकेत स्थळावरून समजेल ,
यामध्ये त्यांनी सूचना टाकलेली आहे ती पाहू .. {"" NOTE : Provisional Answer keys for MAHATET-2014 are made available till 28.12.2014. Send your objection, if any to The Commissioner(MSCE), Maharashtra State Council of Examinations, 17, Dr. Ambedkar Road, Pune-411 001 by Post or Email to mahatet14@gmail.com till 28.12.2014 5.45PM ""} किती दिवसांपासून या सूचनेची वैधता संपली आहे तरीही अजून यात बदल सुद्धा केलेला नाही , संकेतस्थळकडे सुधा लक्ष द्यायला दुर्लक्ष होत असेल तर बाकीच्यांच्या गोष्टींचा विचारच न केलेला बरा ..
काहीही गरज नसताना नको तेवढ्या डीएड कोलेज ची खैरात वाटून बेरोजगारांची संख्या वाढवली , यातच दोन वर्षाचा डिप्लोमा करण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबाचे आर्थिक नियोजन सुधा ढासळले , मधेच शिक्षण संस्थांनी नको तेवढी पिळवणूक केली या अनंत यातना सहन करण्यास एकच अशा शक्ती देत होती , एकच विचार दिलासा देत होता कि मी शिक्षक झाल्यानंतर सर्व व्यवस्थि होईल . परंतु त्या आशेवर सुद्धा शिक्षक भरती बंद झाल्याने पाणी पडले .
आता शिक्षक होण्याची अशा सुधा मावळलेली होती.. ती सोडून देऊन नव्या जोमाने इतर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला काहीजण लागले त्यात अनेकांनी यश सुधा मिळवलेले आहे . बाकीच्या स्पर्धापारीक्षांचा अभ्यासक्रम आणि सिईटी/टीईटी चा अभ्यासक्रम यात खूप मोठ्या प्रमाणात भिन्नता आहे . याच्या अभ्यास करण्याच्या प्रयत्नात दुसर्या परीक्षांचा result सुधा जातो आहे . या सर्व बाबींवरून {...भिक नको पण कुत्रा आवर ..} या मराठी म्हणी प्रमाणे डीएड धारकांची अवस्था झालेली आहे .. तेंव्हा शिक्षक भरती नाही जरी काढली तरी चालेल पण निदान वेळोवेळी काहीतरी खुसपट काढून अशा दाखवणे तरी बंद करा एवढीच विनंती ..
** संदीप प्रभाकर नागरगोजे **
**** गंगाखेड , जि :- परभणी ****
![]() |
Comments
Post a Comment