••• २०१४ संक्षीप्त डायरी ••• आणि ••• २०१५ नवीन वर्षासाठी संकल्प ••••
२०१४ हे खुप सारे अनुभव दिलेलं वर्ष , खुप काही शिकवुन गेलेलं वर्ष .
मित्रांनो खर सांगायच झालं तर जीवनातील प्रत्येक दिवसच काय प्रत्येक क्षण हा एकदाच येत असतो परंतु बहुदा नवीन वर्ष सुरुवात होत असताना दिवस कसे निघुन गेले याची अवलोकन करण्याची संधी येते , वर्षभर केलेली कामे , घडलेल्या घटना , झालेल्या चुका यांच सिंहावलोकन करुन योग्य ते उपाय करण्याची योजना बनवता येते .
माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर हे वर्ष खुप अनुभवमिश्रीत ठरलं वेळोवेळी माझ्या मित्रांनी , मार्गदर्शकांनी मला सहकार्य केलं योग्य ते सल्ले दिले माझ्या जीवनातील नव्या टप्यात मी चांगल्या प्रकारे जम बसवण्यात यशस्वी झालो ते माझ्या मित्र आणि हितचिंतकांमुळेच त्यांचा मी आभार मानण्यापेक्षा सदैव त्यांच्या ऋणातच राहणे पसंद करीन . सर्वांचे नाव लिहीण्याची मनापासुन इच्छा आहे परंतु यादी खुप मोठी असल्याने लिहीनं शक्य नाही .
त्याच बरोबर ३ जुन २०१४ हा आयुष्यात कधीच विसरता न येणारा दिवसही याच वर्षातला
या दिवसाचा सुर्य एवढा काही अंधकारमय होता की लाखो लोकांना प्रकाश देणाऱ्या दिव्याचा प्रकाश या दिवशी अचानक नाहीसा झाला.
लहाणपणापासुन ज्यांना ऐकत , पहात आणि वाचत मोठे झालो असे महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या अकाली जाण्याने जो धक्का बसला त्यातुन आजुनही सावरता येत नाही .
साहेब दैनंदिन जिवनातील एक भागच बनलेले होते .. बातम्यात साहेबांची बातमी नसेल तर मी बातम्याच पहायचो नाही , पेपर मध्ये साहेबांच नाव नसेल , बातमी नसेल तर पेपर वाचायला आवडायचं नाही परंतु हे सर्व काही ३ जुनच्या सुर्योदयापुर्वीच मावळुन गेलं . आणि सकाळी सकाळीच ती काळजाचा ठाव घेणारी बातमी ऐकावयास मिळाली .
नवीन वर्षाच्या निमित्ताने आत्मनिरिक्षण करताना स्वत:कडुन झालेल्या चुका निश्चीतच मनाला वेदना देणाऱ्या आहेत , काही जनांची कळत नकळतपणे मन दुखावली गेली असतील काही चुका झाल्या असतील चर मोठ्या मनाने माफ करा मित्रांनो .
मागच्या वर्षापेक्षा या वर्षात चांगल वागण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे .. आपलं प्रेम , सहकार्य आणि आशिर्वाद नेहमीच माझ्यासोबत असुद्यात ही विनंती ..
हे नववर्ष आपणास व आपल्या कुटूंबियांस आरोग्यदायी, ऐश्वर्यदायी, सुखदायी, शांतीदायी, समाधानदायी, यशदायी, प्रेरणादायी आणि फलदायी जावो ह्याच या क्षणी शुभेच्छा !
येणाऱ्या गुढीपाढव्याला पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा मिळतीलच ज्या मित्रांना आता शुभेच्छा नको असतील त्यांनी नाराज होण्याच काम नाही .. भारतीय संस्क्रती प्रमाणे नवीन वर्ष हे गुढीपाढव्याला सुरु होत असतं याच विचाराचा मी पण एक आहे . परंतु या वेळीही ज्यांना साजरा केल्याने आपली संस्क्रती नष्ट होईल एवढी लिचीपीची आपली संस्क्रती नाही ..
पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा !
आपलाच :- संदीप नागरगोजे
२०१४ हे खुप सारे अनुभव दिलेलं वर्ष , खुप काही शिकवुन गेलेलं वर्ष .
मित्रांनो खर सांगायच झालं तर जीवनातील प्रत्येक दिवसच काय प्रत्येक क्षण हा एकदाच येत असतो परंतु बहुदा नवीन वर्ष सुरुवात होत असताना दिवस कसे निघुन गेले याची अवलोकन करण्याची संधी येते , वर्षभर केलेली कामे , घडलेल्या घटना , झालेल्या चुका यांच सिंहावलोकन करुन योग्य ते उपाय करण्याची योजना बनवता येते .
माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर हे वर्ष खुप अनुभवमिश्रीत ठरलं वेळोवेळी माझ्या मित्रांनी , मार्गदर्शकांनी मला सहकार्य केलं योग्य ते सल्ले दिले माझ्या जीवनातील नव्या टप्यात मी चांगल्या प्रकारे जम बसवण्यात यशस्वी झालो ते माझ्या मित्र आणि हितचिंतकांमुळेच त्यांचा मी आभार मानण्यापेक्षा सदैव त्यांच्या ऋणातच राहणे पसंद करीन . सर्वांचे नाव लिहीण्याची मनापासुन इच्छा आहे परंतु यादी खुप मोठी असल्याने लिहीनं शक्य नाही .
त्याच बरोबर ३ जुन २०१४ हा आयुष्यात कधीच विसरता न येणारा दिवसही याच वर्षातला
या दिवसाचा सुर्य एवढा काही अंधकारमय होता की लाखो लोकांना प्रकाश देणाऱ्या दिव्याचा प्रकाश या दिवशी अचानक नाहीसा झाला.
लहाणपणापासुन ज्यांना ऐकत , पहात आणि वाचत मोठे झालो असे महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या अकाली जाण्याने जो धक्का बसला त्यातुन आजुनही सावरता येत नाही .
साहेब दैनंदिन जिवनातील एक भागच बनलेले होते .. बातम्यात साहेबांची बातमी नसेल तर मी बातम्याच पहायचो नाही , पेपर मध्ये साहेबांच नाव नसेल , बातमी नसेल तर पेपर वाचायला आवडायचं नाही परंतु हे सर्व काही ३ जुनच्या सुर्योदयापुर्वीच मावळुन गेलं . आणि सकाळी सकाळीच ती काळजाचा ठाव घेणारी बातमी ऐकावयास मिळाली .
नवीन वर्षाच्या निमित्ताने आत्मनिरिक्षण करताना स्वत:कडुन झालेल्या चुका निश्चीतच मनाला वेदना देणाऱ्या आहेत , काही जनांची कळत नकळतपणे मन दुखावली गेली असतील काही चुका झाल्या असतील चर मोठ्या मनाने माफ करा मित्रांनो .
मागच्या वर्षापेक्षा या वर्षात चांगल वागण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे .. आपलं प्रेम , सहकार्य आणि आशिर्वाद नेहमीच माझ्यासोबत असुद्यात ही विनंती ..
हे नववर्ष आपणास व आपल्या कुटूंबियांस आरोग्यदायी, ऐश्वर्यदायी, सुखदायी, शांतीदायी, समाधानदायी, यशदायी, प्रेरणादायी आणि फलदायी जावो ह्याच या क्षणी शुभेच्छा !
येणाऱ्या गुढीपाढव्याला पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा मिळतीलच ज्या मित्रांना आता शुभेच्छा नको असतील त्यांनी नाराज होण्याच काम नाही .. भारतीय संस्क्रती प्रमाणे नवीन वर्ष हे गुढीपाढव्याला सुरु होत असतं याच विचाराचा मी पण एक आहे . परंतु या वेळीही ज्यांना साजरा केल्याने आपली संस्क्रती नष्ट होईल एवढी लिचीपीची आपली संस्क्रती नाही ..
पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा !
आपलाच :- संदीप नागरगोजे
Comments
Post a Comment