Skip to main content

२०१४ संक्षिप्त डायरी & २०१५ नवीन वर्षासाठी संकल्प

        ••• २०१४ संक्षीप्त डायरी •••   आणि   ••• २०१५ नवीन वर्षासाठी संकल्प ••••

२०१४ हे खुप सारे अनुभव दिलेलं वर्ष , खुप काही शिकवुन गेलेलं वर्ष .

मित्रांनो खर सांगायच झालं तर जीवनातील प्रत्येक दिवसच काय प्रत्येक क्षण हा एकदाच येत असतो परंतु बहुदा नवीन वर्ष सुरुवात होत असताना दिवस कसे निघुन गेले  याची अवलोकन करण्याची संधी येते , वर्षभर केलेली कामे , घडलेल्या घटना , झालेल्या चुका यांच सिंहावलोकन करुन योग्य ते उपाय करण्याची योजना बनवता येते  .

माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर हे वर्ष  खुप अनुभवमिश्रीत ठरलं वेळोवेळी माझ्या मित्रांनी , मार्गदर्शकांनी मला सहकार्य केलं  योग्य ते सल्ले दिले माझ्या जीवनातील नव्या टप्यात मी चांगल्या प्रकारे जम बसवण्यात यशस्वी झालो ते माझ्या मित्र आणि हितचिंतकांमुळेच त्यांचा मी आभार मानण्यापेक्षा सदैव त्यांच्या ऋणातच राहणे पसंद करीन . सर्वांचे नाव लिहीण्याची मनापासुन इच्छा आहे परंतु यादी खुप मोठी असल्याने लिहीनं शक्य नाही .

त्याच बरोबर ३ जुन २०१४ हा आयुष्यात कधीच विसरता न येणारा दिवसही याच वर्षातला

या दिवसाचा सुर्य एवढा काही अंधकारमय होता की लाखो लोकांना प्रकाश देणाऱ्या दिव्याचा प्रकाश या दिवशी अचानक नाहीसा झाला.

लहाणपणापासुन ज्यांना ऐकत , पहात आणि वाचत  मोठे झालो असे महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या अकाली जाण्याने जो धक्का बसला त्यातुन  आजुनही सावरता येत नाही .

साहेब दैनंदिन जिवनातील एक भागच बनलेले होते .. बातम्यात साहेबांची बातमी नसेल तर मी बातम्याच पहायचो नाही , पेपर मध्ये साहेबांच नाव नसेल , बातमी नसेल  तर पेपर वाचायला आवडायचं नाही परंतु हे सर्व काही ३ जुनच्या सुर्योदयापुर्वीच मावळुन गेलं . आणि सकाळी सकाळीच ती काळजाचा ठाव घेणारी बातमी ऐकावयास मिळाली .

नवीन वर्षाच्या निमित्ताने आत्मनिरिक्षण करताना स्वत:कडुन झालेल्या चुका निश्चीतच मनाला वेदना देणाऱ्या आहेत , काही जनांची कळत नकळतपणे मन दुखावली गेली असतील काही चुका झाल्या असतील चर मोठ्या मनाने माफ करा मित्रांनो .

मागच्या वर्षापेक्षा या वर्षात चांगल वागण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे .. आपलं प्रेम , सहकार्य आणि आशिर्वाद नेहमीच माझ्यासोबत असुद्यात ही विनंती ..

 हे नववर्ष आपणास व आपल्या कुटूंबियांस आरोग्यदायी, ऐश्वर्यदायी, सुखदायी, शांतीदायी, समाधानदायी, यशदायी, प्रेरणादायी आणि फलदायी जावो ह्याच या क्षणी शुभेच्छा ! 

येणाऱ्या गुढीपाढव्याला पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा मिळतीलच ज्या मित्रांना आता शुभेच्छा नको असतील त्यांनी नाराज होण्याच काम नाही .. भारतीय संस्क्रती प्रमाणे नवीन वर्ष हे गुढीपाढव्याला सुरु होत असतं याच विचाराचा मी पण एक आहे . परंतु या वेळीही ज्यांना साजरा केल्याने आपली संस्क्रती नष्ट होईल एवढी लिचीपीची आपली संस्क्रती नाही ..

पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा !

आपलाच :- संदीप नागरगोजे 

Comments

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

*भगवानगडाचे गद्दार मंबाजी*

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य  निर्माण केलं पण त्यासाठी पोषक वातावरण हे शिवजन्मापुर्वीच्या संतांनी केलं होतं. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत सर्वांनीच कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून लोकपदेश करत समाज जागृती केली . जाती व्यवस्थेत वाटल्या गेलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे पुण्यकार्य केले . ज्याचे फळ  अठरापगड जाती धर्मातील लोकांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला स्वराज्यानिर्मीतीच्या कार्यात झोकून दिले ; प्रसंगी स्वराज्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली . शिवाजीराजाला कधी न बघितलेली लोक पण त्या राजावर जिव ओवाळून टाकण्यासाठी तत्पर असत.  कारण शिवाजी राजाच्या कार्याची महती सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य तुकारामांसारख्या संतानी केले आणि समाजात स्वराज्याविषयी  आस्था आणि आपलेपणाची भावना निर्माण केली . स्वतः शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊनी अनेकवेळा अशा अनेकांचे सत्कार केले . संत तुकारामांची ख्याती ऐकून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सत्कार स्वीकारण्यासाठी राजदरबारी येण्याचे आवाहन केले होते . पण तुकारामांनी ते प्रांजळपणे नाकारले ह...