Skip to main content

Posts

Showing posts from 2014

२०१४ संक्षिप्त डायरी & २०१५ नवीन वर्षासाठी संकल्प

        ••• २०१४ संक्षीप्त डायरी •••   आणि   ••• २०१५ नवीन वर्षासाठी संकल्प •••• २०१४ हे खुप सारे अनुभव दिलेलं वर्ष , खुप काही शिकवुन गेलेलं वर्ष . मित्रांनो खर सांगायच झालं तर जीवनातील प्रत्येक दिवसच काय प्रत्येक क्षण हा एकदाच येत असतो परंतु बहुदा नवीन वर्ष सुरुवात होत असताना दिवस कसे निघुन गेले  याची अवलोकन करण्याची संधी येते , वर्षभर केलेली कामे , घडलेल्या घटना , झालेल्या चुका यांच सिंहावलोकन करुन योग्य ते उपाय करण्याची योजना बनवता येते  . माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर हे वर्ष  खुप अनुभवमिश्रीत ठरलं वेळोवेळी माझ्या मित्रांनी , मार्गदर्शकांनी मला सहकार्य केलं  योग्य ते सल्ले दिले माझ्या जीवनातील नव्या टप्यात मी चांगल्या प्रकारे जम बसवण्यात यशस्वी झालो ते माझ्या मित्र आणि हितचिंतकांमुळेच त्यांचा मी आभार मानण्यापेक्षा सदैव त्यांच्या ऋणातच राहणे पसंद करीन . सर्वांचे नाव लिहीण्याची मनापासुन इच्छा आहे परंतु यादी खुप मोठी असल्याने लिहीनं शक्य नाही . त्याच बरोबर ३ जुन २०१४ हा आयुष्यात कधीच विसरता न येणारा दिवसही याच वर्षातला या दिव...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

उतणार नाही , मातणार नाही आणि आयुष्यात कुणापुढे झुकणार नाही

काल परवा मला माझ्या what's app वर एका मित्राने " पंकजाताई जरा सबुरीनं " या शिर्षका खालचा श्री रमेश पतंगे ( जिवनात प्रथमच नाव ऐकले / वाचले ) यांचा पुर्वग्रहदुशीत किंवा आकसयुक्त विचारांतुन लिहीलेल्या पत्राचे कात्रण पाठवले  . सुरुवातीलाच यानी ना.मुंडे ताईंना लिहीलेल्या पत्रातुन भाजपच्या विजयात "ताईंचाही" मोठा वाटा असल्याचे सांगीतले . नावाबरोबर 'ही' वापरल्याने महाराष्ट्रातील आणखी दुसऱ्या कोणत्यातरी नेत्याचा भरपुर वाटा या रमेश पतंगेंना वाटंत असेल ?  साहेबांनंतर भाजप मध्ये पंकजाताई शिवाय असा कोणता जनाधार असलेला नेता आहे ? हे त्यांनाच माहीती .  या पत्रांच हसु तर तेंव्हा येते जेंव्हा जागतीक महान लेखक श्री पतंगे सांगतात कि १९९५ च्या वेळी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी जी संघर्ष यात्रा काढली ती याच रमेशरावांच्या सांगण्यावरुनच . आता या वाक्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा मी माझं डोक आपटुन घेतलेलं बर वाटतं . संघाच आणि स्वत:च मोठेपण सांगत यांनी सामाजीक न्याय आणि समरसता हा समान वैचारीक दुवा सांगत स्वत:ला स्वत:च साहेबांच्या बरोबरीचं करायला सुध्दा यानी मागेपुढे पाह...