मित्रांनो सध्या महाराष्ट्रात सत्तचे जे खंजीरीकरण चालु आहे त्यावर सुचलेल्या काही ओळी आपल्यासोबत शेअर करतोय .. आवडलं तर नक्की कळवा .. •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• महाराष्ट्राचे राजकारण सांगा कुणीकडे जात आहे ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• छत्रपतींचे नाव घेवुन उघड उघड घात आहे जनतेचा केलाय विश्वासघात छत्रपतींची ना कुणालाच साथ आहे महाराष्ट्राचे राजकारण सांगा कुणीकडे जात आहे ? सभाग्रहात ज्याचा विरोधीपक्षनेता त्यांचा सभापती काय कसा होत आहे सत्तेत सहभागी आसणाऱ्यांना विरोधीपक्षाचेच काम जास्त आहे महाराष्ट्राचे राजकारण सांगा कुणीकडे जात आहे ? नाकारले होतं ज्यांना जनतेने त्यांना यांचीच छुपी साथ आहे दिसताहेत सगळे फुसके वादे प्रत्यक्षात ना अच्छे दिन ना अच्छी रात आहे महाराष्ट्राचे राजकारण सांगा कुणीकडे जात आहे ? हातात फुल की फुलावर हात ? शेवटी जनता एकटीच अनाथ आहे ठेवलाय आता विश्वास एकदा नंतर सत्याला साथ , अन्यायाला लाथ आहे महाराष्ट्राचे राजकारण सांगा कुणीकडे जात आहे ? सगळ्यांचे खंजीरीकरण पाहुन 'गोवींदबाग' मात्र सुखात आहे महारा...
सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे.